शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

सामाजिक समता प्रस्थापित करण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान

By admin | Updated: June 27, 2016 01:39 IST

देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून समाजातील दीन-दुबळे, गरीब व वंचित

गडचिरोली : देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून समाजातील दीन-दुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराज यांनी केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रविवारी आयोजित मुख्य सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सुरेश डोंगे, क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, प्रकाश अर्जुनवार आदी उपस्थित होते. यावेळी खासदार नेते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलित उपेक्षीत समाजातील जनतेला आरक्षण लागू केले. विद्यमान शासन या लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवित आहे. आपला देश सर्वजाती धर्माच्या लोकांनी बनलेला आहे. समाजातील विषमता दूर होऊन समाज एकसंघ बनण्यासाठी तळागाळातील माणसाला विकासात समान संधी दिली पाहिजे, असे यावेळी म्हणाले. आमदार डॉ. देवराव होळी यांनी छत्रपती शाहू महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही समाजातील विषमता दूर करण्याचे महान कार्य केले. लोकशाहीत शासन व प्रशासनातील यंत्रणेमध्ये समन्वय ठेवून सामाजिक दायित्वाचे भान राखून काम करण्याची गरज आहे, असे सांगितले. या कार्यक्रमापूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सकाळी ८ वाजता शहरातील इंदिरा गांधी चौकात रॅली काढण्यात आली. या रॅलीत वसंत विद्यालय, शिवाजी हायस्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, कारमेल हायस्कूल, भगवंतराव हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून लोकांना सामाजिक समतेचा संदेश दिला. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुरेश पेंदाम यांनी केले.