शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक समता प्रस्थापित करण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान

By admin | Updated: June 27, 2016 01:39 IST

देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून समाजातील दीन-दुबळे, गरीब व वंचित

गडचिरोली : देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून समाजातील दीन-दुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराज यांनी केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रविवारी आयोजित मुख्य सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सुरेश डोंगे, क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, प्रकाश अर्जुनवार आदी उपस्थित होते. यावेळी खासदार नेते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलित उपेक्षीत समाजातील जनतेला आरक्षण लागू केले. विद्यमान शासन या लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवित आहे. आपला देश सर्वजाती धर्माच्या लोकांनी बनलेला आहे. समाजातील विषमता दूर होऊन समाज एकसंघ बनण्यासाठी तळागाळातील माणसाला विकासात समान संधी दिली पाहिजे, असे यावेळी म्हणाले. आमदार डॉ. देवराव होळी यांनी छत्रपती शाहू महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही समाजातील विषमता दूर करण्याचे महान कार्य केले. लोकशाहीत शासन व प्रशासनातील यंत्रणेमध्ये समन्वय ठेवून सामाजिक दायित्वाचे भान राखून काम करण्याची गरज आहे, असे सांगितले. या कार्यक्रमापूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सकाळी ८ वाजता शहरातील इंदिरा गांधी चौकात रॅली काढण्यात आली. या रॅलीत वसंत विद्यालय, शिवाजी हायस्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, कारमेल हायस्कूल, भगवंतराव हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून लोकांना सामाजिक समतेचा संदेश दिला. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुरेश पेंदाम यांनी केले.