शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

सात हजार लाभार्थ्यांवरच पेन्शन योजना अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:00 AM

खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली.

ठळक मुद्देप्रचार-प्रसार थंडावला : असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : असंघटित क्षेत्रातील कामगार, व्यापारी तसेच शेतकरी वर्गाला पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये सुरू केली. शासनाच्या दबावामुळे सुरूवातीला या योजनेचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी या योजनेत सहभागी झाले. त्यानंतर मात्र शासन व प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने आता या योजनेचा विस्तार कमी झाला आहे. जिल्हाभरातील केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ घेतला आहे.खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीचे बँक खाते आहे, अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येते. १८ ते ४० वयोगटातील असंघटीत क्षेत्रातील नागरिक या योजनेचे लाभार्थी बनू शकतात. वार्षिक ४२ रुपये ते १४५४ रुपये असा लाभार्थीच्या वयानुसार हप्ता ठरतो.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र शासनाचा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बराच दबाव होता. त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बँकेचे कर्मचारी योजनेविषयी माहिती देत होते. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे सुध्दा योजनेच्या प्रचार प्रसाराच्या कामाला लागले होते. २०१५ नंतर भाजप सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्या योजनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रीत झाले. अटल पेन्शनकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढण्यावर मर्यादा येत आहेत. मागील चार वर्षाच्या कालावधीत या योजनेचा लाभ केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी घेतला आहे.योजनेच्या विस्ताराची गती मंदावली असल्याचे दिसून येते. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत चांगली योजना आहे. मात्र योजनेकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.योजनेची वैशिष्ट्येया योजनेंतर्गत लाभार्थ्याला वार्षिक हप्ता केवळ ४२ रुपये ते १४५४ रुपये एवढा भरायचा आहे. १८ ते ४० या वयोगटातील नागरिक या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. वयानुसार हप्त्याची रक्कम बदलते. जेवढे वय अधिक तेवढी हप्त्याची रक्कम अधिक राहते. लाभार्थ्याला ६० वर्ष वयानंतर मासिक एक हजार रुपये ते पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. तसेच वारसदाराला १.७ लाख रुपये ते ८.५ लाख रुपये दिले जातील.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन