शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

२८ पोलीस कर्मचाऱ्यांवर ५५ गावांच्या सुरक्षेचा भार

By admin | Updated: May 13, 2016 01:34 IST

जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.

चोरींच्या घटनांमध्ये वाढ : आष्टी पोलीस ठाण्याला हवेत ५० कर्मचारी आष्टी : जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. या पोलीस ठाण्याला २८ पोलीस कर्मचारी देण्यात आले. मात्र सदर संख्या अपुरी आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार पाहता आष्टी पोलीस ठाण्याला ५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आष्टी परिसरात घडणारे विविध गुन्हे व चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आष्टी पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर येथे ५० ते ६० कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे राज्य शासनामार्फत सांगण्यात आले होते. मात्र याला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही आष्टी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली नाही. आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ५५ गावांचा समावेश आहे. या ५५ गावांच्या परिसरात घडणाऱ्या विविध घटना, गुन्हे, आत्महत्या, भांडण, तंटे आदींची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. काही दिवसापूर्वी आष्टी गावात अज्ञात चोरट्यांनी दोन दिवसात नऊ ठिकाणी घरफोडी केली. त्यामुळे गावातील नागरिक धास्तावले आहेत. वाढत्या चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर आहे. सद्य:स्थितीत आष्टी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून उमेश बेसरकर आहेत. याशिवाय तीन पोलीस उपनिरीक्षक, महिला व पुरूष पोलीस कर्मचारी असे एकूण २८ कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने आष्टी पोलीस ठाण्यात आणखी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)