शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

२८ पोलीस कर्मचाऱ्यांवर ५५ गावांच्या सुरक्षेचा भार

By admin | Updated: May 13, 2016 01:34 IST

जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.

चोरींच्या घटनांमध्ये वाढ : आष्टी पोलीस ठाण्याला हवेत ५० कर्मचारी आष्टी : जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. या पोलीस ठाण्याला २८ पोलीस कर्मचारी देण्यात आले. मात्र सदर संख्या अपुरी आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार पाहता आष्टी पोलीस ठाण्याला ५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आष्टी परिसरात घडणारे विविध गुन्हे व चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आष्टी पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर येथे ५० ते ६० कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे राज्य शासनामार्फत सांगण्यात आले होते. मात्र याला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही आष्टी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली नाही. आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ५५ गावांचा समावेश आहे. या ५५ गावांच्या परिसरात घडणाऱ्या विविध घटना, गुन्हे, आत्महत्या, भांडण, तंटे आदींची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. काही दिवसापूर्वी आष्टी गावात अज्ञात चोरट्यांनी दोन दिवसात नऊ ठिकाणी घरफोडी केली. त्यामुळे गावातील नागरिक धास्तावले आहेत. वाढत्या चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर आहे. सद्य:स्थितीत आष्टी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून उमेश बेसरकर आहेत. याशिवाय तीन पोलीस उपनिरीक्षक, महिला व पुरूष पोलीस कर्मचारी असे एकूण २८ कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने आष्टी पोलीस ठाण्यात आणखी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)