शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शालेय कर्मचारी भरती प्रक्रिया बदलली

By admin | Updated: June 25, 2014 00:26 IST

शालेय कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे़ खाजगी शाळेतील कर्मचारी भरती करिता मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडे कर्मचाऱ्यांच्या भरतीचे

महेंद्र चचाणे - देसाईगंजशालेय कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे़ खाजगी शाळेतील कर्मचारी भरती करिता मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडे कर्मचाऱ्यांच्या भरतीचे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत़ या आशयाचा शासनादेश २० जून २०१४ ला निघाला आहे़ शासनादेशामुळे शिक्षणाधिकारी यांच्या अधिकाराला मर्यादा आली असून खाजगी शाळा देखील मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यकक्षेत आल्या आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करीता पूर्वी माध्यमिक व प्राथमिक शाळा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागत होता़ प्रस्तावाची पडताळणी करून सबंधीत शिक्षणाधिकारी कार्यालय नियुक्तीस मान्यता देत होते. मात्र शासनाने २० जून २०१४ ला काढलेल्या शासनादेशानुसार खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत आमुलाग्र बदल केला आहे़ शासनादेशानुसार खाजगी शाळेतील कर्मचाऱ्याच्या भरती करीता जिल्हास्तरावर चार सदस्यीय समिती बनविण्यात येईल़ मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे या समितीचे पदसिध्द अध्यक्ष राहणार आहेत़ तर शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक हे सदस्य सचिव म्हणून कार्य करतील़ जिल्हा समाजकल्याण अधिकारी व प्राचार्य डायट हे समितीचे सदस्य राहतील़ रिक्त जागेच्या सबंधाने शासनादेशात सबंधित रिक्त पदांची निश्चिती संचमान्यतेनुसार आहे याची तपासणी करणे, प्रस्तावीत रिक्त जागेकरीता अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध असेल तर त्याच्या समायोजना बाबत पडताळणी करावी, जी पदे रिक्त असतील त्या बाबत संस्थेनी बिंदूनामावली तयार करून सक्षम अधिकाऱ्याकडून ती प्रमाणित करून घेतली आहे किंवा नाही याची खात्री करणे या सर्व पडताळण्या झाल्यानंतर पदे भरण्याची जाहिरात काढण्यास मंजुरी प्रदान करणे़ यानंतर सबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी वैयक्तीक मान्यतेची शिबिरे आयोजित करून त्या शिबीरात सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मान्यता देण्याचे अधिकार देतील़ शिबिरे संपल्यानंतर वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शाळानिहाय माहिती समिती पुढे ठेवण्यात येईल़ शासनादेशात नमुद केलेली प्रक्रिया पूर्ण न करता बेधडक पद मान्यतेस मंजूरी दिल्यास शिक्षणाधिकारी व्यक्तीश: जबाबदार राहतील़ तसेच महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती १९८१ च्या तरतूदी नुसार शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्याच्या बदल्यांना नियमानुसार मान्यता देण्याचे देखील सांगितले आहे़