शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील शाळा ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर शासनाने शिक्षणावर विशेष भर दिला. या अंतर्गत गाव तिथे जिल्हा परिषदेच्या शाळा उघडण्यात आल्या. पूर्वी या गावातील विद्यार्थी आश्रमशाळेत दुसऱ्या गावी पाठविले जात होते. गावात शाळा झाल्यापासून पालकांनी जिल्हा परिषदेच्याच शाळेत आपल्या पाल्यांना पाठविण्यास सुरूवात केली होती. मात्र दुर्गम व नक्षलग्रस्त भाग आहे. जाण्यास रस्ते नाही. आदी विविध कारणे दाखवून जिल्हा परिषदेचे शिक्षक शाळांमध्ये पोहोचत नाही.

ठळक मुद्देशाळा नियमित उघडत नसल्याचा परिणाम : एटापल्ली तालुक्यातील आठ शाळांची पटसंख्या केवळ एक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/एटापल्ली : विविध उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी खेचण्याचा प्रयत्न होत असला तरी हा प्रयत्न दुर्गम भागात अपूरा पडत असल्याचे दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्यात एकूण १८७ शाळा आहेत. यातील ७४ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर शासनाने शिक्षणावर विशेष भर दिला. या अंतर्गत गाव तिथे जिल्हा परिषदेच्या शाळा उघडण्यात आल्या. पूर्वी या गावातील विद्यार्थी आश्रमशाळेत दुसऱ्या गावी पाठविले जात होते. गावात शाळा झाल्यापासून पालकांनी जिल्हा परिषदेच्याच शाळेत आपल्या पाल्यांना पाठविण्यास सुरूवात केली होती. मात्र दुर्गम व नक्षलग्रस्त भाग आहे. जाण्यास रस्ते नाही. आदी विविध कारणे दाखवून जिल्हा परिषदेचे शिक्षक शाळांमध्ये पोहोचत नाही. आठवड्यातून एक ते दोन दिवस शाळा उघडली जाते. याचा अनुभव पालक वर्गाला येण्यास सुरूवात झाल्याने पालकांनी पुन्हा आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी पाठविण्यास सुरूवात केली. त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षक, शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अन्यथा यावर्षी जो एक विद्यार्थी शाळेत आहे, तो पुढच्या वर्षी राहणारच याची शक्यता नाही. त्यामुळे शाळाच बंद पडण्याची भिती आहे.
एक ते दोन पटसंख्या असलेल्या शाळा केवळ एटापल्ली तालुक्यातच नाही तर धानोरा, भामरागड, कोरची, सिरोंचा याही तालुक्यांमध्ये आहेत. विद्यार्थी नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी टिकविणे आवश्यक आहे, हे आव्हान जिल्हा परिषद शिक्षकांना पेलावे लागणार आहे. अन्यथा अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढून शिक्षकाची नोकरीच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शाळांचे समायोजन पुढे रेटण्याची शक्यता
१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून येथील विद्यार्थ्यांचे जवळपासच्या मोठ्या शाळेत समायोजन करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. असे झाल्यास अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. शिक्षक संघटनांनी दबाव आणला. या दबावामुळे शासनाने काही दिवस समायोजनाला स्थगिती दिली आहे. नोकऱ्या वाचविण्यासाठी शिक्षक धडपडत असले तरी एका विद्यार्थ्यावर शासन १० लाख रुपये खर्च करीत आहे. हे शासनाला परवडणारे आहे काय? याचेही चिंतन होण्याची गरज आहे. भविष्यात शाळा समायोजनाचा मुद्दा शासनाकडून रेटला जाऊन अनेक शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जि.प. शाळांच्या तुलनेत आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च कमी आहे. त्यामुळे शासन आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी विशेष भर देत आहे. हा भविष्यातील मोठा संकेत आहे.

१० लाख खर्चूनही विद्यार्थ्याला मराठी वाचता येत नाही
प्रत्येक शाळेला किमान एक शिक्षक देण्यात आला आहे. याचा अर्थ एटापल्ली तालुक्यातील केवळ एक पटसंख्या असलेल्या आठ शाळांमध्ये एक शिक्षक असेलच. शिक्षकाचे मासिक वेतन ६० हजार रुपये या हिशोबाने वर्षाचे वेतन ७ लाख २० हजार रुपये, प्रशिक्षण, शाळेचा किरकोळ खर्च पकडल्यास एका शाळेचा एकूण खर्च १० लाख रुपयांच्या जवळपास आहे. १० लाख रुपये खर्चून एका विद्यार्थ्याला शिकविले जाते. तरीही चवथीच्या विद्यार्थ्याला निट मराठी वाचता येत नाही. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक सहजासहजी तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा काही शिक्षकांकडून उचलला जातो. शिक्षक शाळेत जातच नाही. त्यामुळे विद्यार्थी शिकत नसल्याने त्याला वाचता येत नाही.

टॅग्स :Schoolशाळा