शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे काम ३१ टक्क्यावर

By admin | Updated: May 24, 2015 02:15 IST

भूमिहीन, शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या नववी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या

दिलीप दहेलकर  गडचिरोलीभूमिहीन, शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या नववी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या आम आदमी विमा योजनेच्या नोंदणीला जिल्हा भरात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत एकूण पाच हजार ५२३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून या योजनेच्या शिष्यवृत्तीचे काम ३१ टक्क्यावर पोहोचले आहे. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे सदर शिष्यवृत्तीचे काम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.आम आदमी विमा योजना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविली जाते. भूमीहिन, शेतमजूर, अडीच एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. सदर योजना भारतीय आयुर्विमा (एलआयसी) महामंडळामार्फत राबविले जात आहे. विम्याचा २०० रूपयांचा हप्ता केंद्र व राज्य सरकार भरते. अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार, नैसर्गिक मृत्यू आल्यास ३० हजार रूपयांचे संरक्षण लाभार्थीच्या वारसास मिळते. तर एक हात किंवा पाय यांना कायमचे अपंगत्त्व आल्यास ३७ हजार ५०० रूपये तसेच दोन्ही हात किंवा पायांना कायमचे अपंगत्त्व आल्यास ७५ हजार रूपयांची नुकसान भरपाई दिली जाते. याशिवाय नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या दोन अपत्यांना दर महिन्याला १०० रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी एकूण १८ हजार लाभार्थी निवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. १ जुलै ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात सदर योजनेचे भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे एकूण पाच हजार ३७६ विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यात आले. यापैकी चार हजार १२५ विद्यार्थ्यांचे अर्ज एलआयसीने मंजूर केले आहे.