शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

म्हणे गिरीधर ‘भगोडा’, माओवाद्यांची आगपाखड, आत्मसर्मपणानंतर २४ तासांतच पत्रक

By संजय तिपाले | Updated: June 23, 2024 20:21 IST

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांची व्यूहरचना आखून त्याआधारे घातपाती कारवाया करणारा जहाल नेता नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने २२ जूनला पत्नी संगीतासमवेत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर २४ तासांच्या आतच माओवाद्यांनी पत्रक जारी करुन आगपाखड केली आहे.

-संजय तिपालेगडचिरोली - जिल्ह्यातील नक्षल्यांची व्यूहरचना आखून त्याआधारे घातपाती कारवाया करणारा जहाल नेता नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने २२ जूनला पत्नी संगीतासमवेत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर २४ तासांच्या आतच माओवाद्यांनी पत्रक जारी करुन आगपाखड केली आहे. या पत्रकात गिरीधरला ‘भगोडा’ संबोधित केले असून, जनता त्यास कधीच माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.

नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने नक्षल चळवळीसाठी २८ वर्षे दिली होती. सदस्य ते नेता असा प्रवास त्याने केला.  १७९ गुन्हे नोंद असल्याने तो पोलिसांसाठी मोस्ट वाँटेड होता. दरम्यान, त्याच्यावर शासनाचे २५ लाख रुपयांचे तर पत्नी संगीता हिच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. २२ जूनला  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्यानंतर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.  यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांनी शरण यावे किंवा बंदुकीच्या गोळ्या खाण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड इशारा देत गिरीधर व त्याच्या पत्नीच्या आत्मसमर्पणानंतर नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे म्हटले होते.

यानंतर माओवाद्यांच्या   पश्चिम सबझोजनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने   पत्रक जारी केले. त्यात  म्हटले आहे की, गिरीधर आणि त्याची पत्नी ४ जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले.  १९९६ मध्ये गिरीधर नक्षल चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर जाऊन त्याने दंडकारण्यातील उच्च पद प्राप्त केले, परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक नक्षल नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याला समर्थपणे तोंड देण्याऐवजी गिरीधरने भयभीत होऊन पोलिसांपुढे शरणागती पत्करली, अशी टीकाही   केली आहे. दिवंगत नक्षल नेत्यांचा उल्लेख दिवंगत नक्षल नेते पेद्दीशंकर, जोगन्ना, मल्लेश, नर्मदाक्का, सृजनक्का, विकास, भास्कर, संजय, विनू, इंदिरा, वासू   यांच्या कारकीर्दीचा उल्लेख करुन श्रीनिवास याने गडचिरोलीच्या नक्षल आंदोलनाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात चळवळ सोडून पळणारा गिरीधर हा पहिलाही नाही आणि शेवटचाही नसेल, असे म्हटले आहे.

अनेक नक्षलवादी चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येत आहेत, त्यामुळे या चळवळीत सक्रिय असलेल्यांमध्ये नैराश्य आले आहे.  यातूनच ते अशाप्रकारे पत्रक काढून आत्मसमर्पणाच्या तयारीत असलेल्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, पोलिस सर्व ते सहकार्य करण्यास तयार आहेत.  - नीलोत्पल (पोलिस अधीक्षक, गडचिरोली)  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली