शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेती उपशाने पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

सोडे नदीची रेती अतिशय चांगली आहे. त्यामुळे या रेतीची विशेष मागणी असल्याने रेती तस्कर याच नदीतून रेतीची चोरी करीत आहेत. रेती चोरलेल्या पात्राची पाहणी केल्यस पाचशेपेक्षा अधिक ब्रॉस रेतीची चोरी झाली आहे, असे दिसून येईल. एवढेच नाही तर अगदी पुलाच्या पिलरपर्यंत खड्डा पाडला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : सोडे नदीतून हजारो ब्रॉस रेतीची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या धानोरा-रांगी मार्गावरील सोडे नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे, रेती तस्करांनी पुलाच्या पिलरपर्यंत जवळपास चार फूट खोलपर्यंत रेती उपसली आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झालाा आहे. महसूल विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाळू उपसा धोरणानुसार ३० सप्टेंबर रोजी मागील वर्षीच्या लिलावाची मुदत संपली. अजूनपर्यंत रेती घाटांचे नवीन लिलाव झाले नाही. पावसाळा संपल्यानंतर घर, पूल, रस्ते व इतर शासकीय इमारतींच्या बांधकामांना वेग आला आहे. त्यामुळे रेतीची मागणी वाढली असताना रेतीची वाहतूक करण्यावर बंदी आहे. घराचे काम ठप्प राहू नये, यासाठी पाहिजे तेवढी किंमत मोजायला घर मालक व कंत्राटदार तयार आहेत. याचा फायदा रेती तस्करांनी उचलण्यास सुरूवात केली आहे. रात्रीच्या सुमारास तर कधीकधी भरदिवसा सुध्दा रेती तस्करी केली जात आहे. जवळपास तीन ते चार हजार रुपये प्रती ट्रॅक्टर दराने रेती विकली जात असल्याने पैशाची लालच रेती तस्करांनी लागली आहे. रेती तस्करी करताना ट्रॅक्टर आढळून आल्यास १ लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. यालाही न मानता रेती तस्कर रेतीची वाहतूक करीत आहेत.सोडे नदीची रेती अतिशय चांगली आहे. त्यामुळे या रेतीची विशेष मागणी असल्याने रेती तस्कर याच नदीतून रेतीची चोरी करीत आहेत. रेती चोरलेल्या पात्राची पाहणी केल्यस पाचशेपेक्षा अधिक ब्रॉस रेतीची चोरी झाली आहे, असे दिसून येईल. एवढेच नाही तर अगदी पुलाच्या पिलरपर्यंत खड्डा पाडला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेती निघून गेल्यास पुलाचा पिलर कोसळण्याचा धोका असल्याने नदी घाटाचा लिलाव करताना पुलाजवळ रेती उपसू दिली जात नाही. रेती चोरट्यांनी मात्र पिलरपर्यंत रेतीचा उपसा केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.गडचिरोलीतील रेतीची तस्करी वाढलीगडचिरोली : गडचिरोली शहरात बांधकामांना वेग आला आहे. मात्र रेतीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. बांधकाम ठप्प पडू नये, यासाठी घर मालक अधिकची किंमत देण्यास तयार असल्याने रात्रीच्या सुमारास जवळपासच्या नदी पात्रामधून रेती चोरून आणत आहेत. रात्री महसूल कर्मचारी पाळत ठेवू शकत नाही. ही बाब रेती तस्करांना माहित असल्याने रात्रीच्या सुमारास रेती चोरली जात आहे. रेतीची तस्करी होऊ नये, यासाठी महसूल विभाग प्रयत्न करीत असला तरी त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे.वर्दळीचा मार्गधानोरा-रांगी हा अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गाने तलाठी, मंडळ अधिकारी व इतर कर्मचारी नेहमीच प्रवास करतात. असे असतानाही शेकडो ब्रॉस रेती चोरली असताना या अधिकाऱ्यांच्या आजपर्यंत कसे काय लक्षात आले नाही. महसूल विभागाच्या अधिकाºयांना काही टक्का हिस्सा आम्ही देतो. त्यामुळे ते आमच्यावर कोणतीच कारवाई करू शकत नाही, असे रेती तस्कर खुलेआम सांगत आहेत. विशेष म्हणजे, अगदी वर्दळीच्या मार्गावरून रेती चोरी होत असतानाही कारवाई होत नसल्याने रेती तस्करांच्या बोलण्यात सत्यता असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, सोडे नदी पात्राचा कधीच लिलाव होत नाही. त्यामुळे जेवढा खड्डा पाडल्या गेला आहे, तेवढ्या खड्ड्यातील संपूर्ण रेती चोरून नेण्यात आली आहे. यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागला आहे.

टॅग्स :sandवाळू