शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

वादळाच्या तडाख्याने घरांचे छप्पर उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:23 IST

तालुक्यातील रामपूर चक गावाला गुरुवारच्या सायंकाळी झालेल्या वादळाने चांगलाच तडाखा दिला. वादळामुळे या गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील छत उडाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देपंचनामे करा : रामपूर चक येथील २० पेक्षा अधिक घरांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील रामपूर चक गावाला गुरुवारच्या सायंकाळी झालेल्या वादळाने चांगलाच तडाखा दिला. वादळामुळे या गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील छत उडाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.सायंकाळी जोरदार वादळ झाले. या वादळात देवीदास प्रधान, अरविंद गुरनुले, श्रीराम प्रधान, उमाजी प्रधान, लक्ष्मण लेनगुरे, रामचंद्र प्रधान, हरिदास गुरनुले, बाबुराव गुरनुले, रामचंद्र लेनगुरे, विनायक लेनगुरे, विठ्ठल लेनगुरे, तुकडोजी लेनगुरे, अभिमन्यू सहारे, सुरेश चौधरी, प्रल्हाद ठेंगरी, सरस्वती निकुरे, सत्यभामा ठाकरे, अर्जुनदास प्रधान, जगन वाटगुरे, मारोती लेनगुरे, संजय निकुरे, प्रकाश गुरनुले, अशोक प्रधान, सुरेश प्रधान, दयाराम ठेंगरी, बबन माकडे, लक्ष्मण सहारे, गोपाल राऊत यांच्या घराचे नुकसान झाले.याबाबतची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली आहे. तलाठ्यांच्या मार्फत नुकसानीचे सर्वे करून ज्या नागरिकांच्या घरांचे छत उडाले आहे किंवा घर कोसळले आहे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.ऐन पावसाळ्याच्या दिवसात काही नागरिकांच्या घर व गोठ्यावरील टीन उडाले. तर काही नागरिकांच्या घरावरील कवेलू उडून गेले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पैसा जमा करून ठेवला आहे. हा पैसा आता घर दुरूस्तीवर खर्च करावा लागणार आहे. घर दुरूस्तीत पैसा खर्च झाल्यास हंगामासाठी कुठून पैसा आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ऐन पावसाळ्यात घरावरील छत उडाल्याने ते दुरूस्तच करावे लागणार आहे.शेतीचा हंगाम सोडून शेतकऱ्यांना घर दुरूस्तीची कामे करावी लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोेर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा नागरिकांच्या घरांचे पंचनामे करून संबंधित नागरिकांना मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी गाव गाठून नुकसानीची माहिती तहसीलदारांना देऊन पंचनामे करण्याची मागणी केली.

टॅग्स :Rainपाऊस