शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वादळाच्या तडाख्याने घरांचे छप्पर उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:23 IST

तालुक्यातील रामपूर चक गावाला गुरुवारच्या सायंकाळी झालेल्या वादळाने चांगलाच तडाखा दिला. वादळामुळे या गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील छत उडाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देपंचनामे करा : रामपूर चक येथील २० पेक्षा अधिक घरांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील रामपूर चक गावाला गुरुवारच्या सायंकाळी झालेल्या वादळाने चांगलाच तडाखा दिला. वादळामुळे या गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील छत उडाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.सायंकाळी जोरदार वादळ झाले. या वादळात देवीदास प्रधान, अरविंद गुरनुले, श्रीराम प्रधान, उमाजी प्रधान, लक्ष्मण लेनगुरे, रामचंद्र प्रधान, हरिदास गुरनुले, बाबुराव गुरनुले, रामचंद्र लेनगुरे, विनायक लेनगुरे, विठ्ठल लेनगुरे, तुकडोजी लेनगुरे, अभिमन्यू सहारे, सुरेश चौधरी, प्रल्हाद ठेंगरी, सरस्वती निकुरे, सत्यभामा ठाकरे, अर्जुनदास प्रधान, जगन वाटगुरे, मारोती लेनगुरे, संजय निकुरे, प्रकाश गुरनुले, अशोक प्रधान, सुरेश प्रधान, दयाराम ठेंगरी, बबन माकडे, लक्ष्मण सहारे, गोपाल राऊत यांच्या घराचे नुकसान झाले.याबाबतची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली आहे. तलाठ्यांच्या मार्फत नुकसानीचे सर्वे करून ज्या नागरिकांच्या घरांचे छत उडाले आहे किंवा घर कोसळले आहे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.ऐन पावसाळ्याच्या दिवसात काही नागरिकांच्या घर व गोठ्यावरील टीन उडाले. तर काही नागरिकांच्या घरावरील कवेलू उडून गेले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पैसा जमा करून ठेवला आहे. हा पैसा आता घर दुरूस्तीवर खर्च करावा लागणार आहे. घर दुरूस्तीत पैसा खर्च झाल्यास हंगामासाठी कुठून पैसा आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ऐन पावसाळ्यात घरावरील छत उडाल्याने ते दुरूस्तच करावे लागणार आहे.शेतीचा हंगाम सोडून शेतकऱ्यांना घर दुरूस्तीची कामे करावी लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोेर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा नागरिकांच्या घरांचे पंचनामे करून संबंधित नागरिकांना मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी गाव गाठून नुकसानीची माहिती तहसीलदारांना देऊन पंचनामे करण्याची मागणी केली.

टॅग्स :Rainपाऊस