शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

रोहयो कामात आठ तालुके माघारले

By admin | Updated: January 29, 2017 01:32 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या

ग्रामपंचायती उदासीन : मजूर उपस्थिती कमी प्रमाणात गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर विविध कामे मंजूर करण्यात आली आहे. मात्र रोहयोच्या कामात धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा हे चार तालुके आघाडीवर असून येथील रोहयो कामांवर मजुरांची उपस्थिती प्रचंड आहे. मात्र इतर आठ तालुके रोहयोच्या कामात माघारले असल्याचे दिसून येते. रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या बाराही तालुक्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीमध्ये विवधि कामे घेण्यात आली आहेत. ५० टक्के कामे ग्रामपंचायतस्तरावर सुरू असून कामे सुरू असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या ५६५ आहे. या कामांवर एकूण १५ हजार १४८ इतकी मजूर उपस्थिती आहे. ५० टक्के यंत्रणास्तरावर सद्य:स्थितीत २७६ कामे सुरू असून या कामांवर ५ हजार ६८४ मजूर उपस्थिती आहे. ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून सद्य:स्थितीत ८४१ कामे सुरू असून या कामावर एकूण २० हजार ८३२ इतकी मजूर उपस्थिती आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत सद्य:स्थितीत रस्त्यांची ७४, बोडीची १७, मजगीची १३०, सिंचन विहिरींची ५३, वृक्ष लागवडीची १९, शौचालय बांधकामाची ३१, रोपवाटीकेची ५३, वन तलाव दुरूस्तीची ५८ व इतर स्वरूपाची १२१ कामे सुरू आहेत. रस्त्याच्या कामावर ६ हजार २५२, बोडीच्या कामावर २८९, मजगीच्या कामावर ६ हजार ७८८, शेततळ्याच्या कामावर ३४२, सिंचन विहिरीच्या कामावर ४८३ व इतर कामे मिळून एकूण १५ हजार १४८ मजूर उपस्थिती आहे. गडचिरोली तालुक्यात सुरू असलेल्या कामावर ३७०, मुलचेरा तालुक्यातील कामावर १ हजार १५४, देसाईगंज ७२५, अहेरी १ हजार ४१४, एटापल्ली ५७२, भामरागड ३५२, सिरोंचा तालुक्यातील रोहयो कामांवर ३२५ मजुरांची उपस्थिती आहे. रोहयोची कामे व त्यावरील मजुरांच्या उपस्थितीत सदर आठ तालुके माघारले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) गतवर्षीच्या तुलनेत कामाची मागणी कमी ४गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेती कामे न मिळाल्याने मजूर रिकाम्या हाताने कामाची प्रतीक्षा करीत होती. गतवर्षी जानेवारी महिन्यात रोहयोच्या कामाची मजुरांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती नसून रबी हंगामातील शेतीतील कामे सुरू आहेत. त्यामुळे यंदा रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरांकडून पाहिजे त्या प्रमाणात मागणी होताना दिसून येत नाही. फेब्रुवारी व मार्च महिन्यात मजुरांकडून रोहयोच्या कामाची मागणी वाढणार आहे. २०० वर ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे बंदच ४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकारची कामे मंजूर करण्यात आली आहे. मात्र सद्य:स्थितीत जिल्ह्यातील केवळ जवळपास २०० ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू आहेत. मात्र २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू नाहीत. त्यामुळे येथील मजुरांना रोजगार मिळाला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन कामे सुरू करावीत, अशी मागणी आहे.