शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराअभावी रानगव्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:24 IST

आलापल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कक्ष क्रमांक ४३ मध्ये रानगव्याचा मृत्यू झाला, असून सदर रानगव्याचा मृत्यू हा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : वन विभागाने केली निष्काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कक्ष क्रमांक ४३ मध्ये रानगव्याचा मृत्यू झाला, असून सदर रानगव्याचा मृत्यू हा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.रानगवा हा शाकाहारी वर्गातील मोठा प्राणी आहे. रानगव्यांची संख्या देशात अतिशय कमी असल्याने त्याला शेड्युल क्रमांक १ मध्ये टाकण्यात आले आहे. सुदैवाने गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर परिसरातील कोलामार्का या भागात रानगव्यांचे वास्तव्य आहे. या प्राण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन या कोलामार्का परिसराला रानगव्यांचे अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले आहे.चार ते पाच दिवसांपूर्वी एक रानगवा जखमी अवस्थेत आलापल्ली परिसरातील जंगलात लंगडत फिरत होता. याची माहिती काही वन्यप्रेमींनी आलापल्ली वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांना दिली. मात्र त्यांनी रानगव्याकडे कायमचे दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे मात्र रानगवा मिळतच नसल्याची माहिती वरिष्ठांना देत होते. त्यामुळे वरिष्ठांशी सुध्दा दिशाभूल झाली. आलापल्ली येथील वन व्यवस्थापन समिती, पेसा कोष समिती व वनहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून रानगव्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचाराअभावी रानगव्याचा मृत्यू झाला. रानगवा हा दूर्मिळ प्राणी आहे. तरीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. या रानगव्याला पायखूर हा संसर्गजन्य रोग झाला होता. हाच रोग इतरही प्राण्यांना होण्याची शक्यता आहे. आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांना फोन करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद होता.

टॅग्स :forest departmentवनविभाग