शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

हातकाट्यामुळे प्रत्येक ४० किलोच्या पोत्याच्या वजनात दीड ते दोन किलो धान अधिकचे जात आहे. यात शेतकºयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता, देसाईगंज येथील कृषी बाजार समितीच्या यार्डमध्ये व देसाईगंज तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन व आविका संस्थेच्या केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक काटे पुरविण्यात आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देहातकाट्याचा वापर : इलेक्ट्रॉनिक्स काटे धूळखात

अरूण राजगिरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव/चोप : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत अनुक्रमे आदिवासी विविध कार्यकारी संस्था व खरेदी-विक्री सहकारी संस्थांच्या वतीने जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र देसाईगंज तालुक्यातील केंद्रांवर हातकाट्याचाच वापर केला जात असल्याने काट्याच्या वजनात शेतकऱ्यांची लूट होत आहे.आधारभूत धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याच्या सहाय्याने धानाची खरेदी करणे शासनाचे बंधनकारक केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देसाईगंज तालुक्यात खरेदी विक्री सहकारी संस्थांच्या व आविकां संस्थांच्या केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटेही पुरविण्यात आले आहेत. मात्र या इलेक्ट्रॉनिक काट्यांना धूळखात ठेवून व नियमाला बगल देऊन पारंपरिक व साध्या हातकाट्याने धानाची मोजणी केली जात आहे.हातकाट्यामुळे प्रत्येक ४० किलोच्या पोत्याच्या वजनात दीड ते दोन किलो धान अधिकचे जात आहे. यात शेतकºयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता, देसाईगंज येथील कृषी बाजार समितीच्या यार्डमध्ये व देसाईगंज तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन व आविका संस्थेच्या केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक काटे पुरविण्यात आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. देसाईगंज तालुक्यात मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देसाईगंज व यावर्षी नव्यानेच कोरेगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. पिंपळगाव येथे आविका संस्थेचे आधारभूत केंद्र आहे. वडसा, कोरेगाव व पिंपळगाव या तीनही केंद्रावर नियमाला बगल देऊन धानाचा हातकाटा केला जात आहे.शेतकऱ्यांची अशा पद्धतीने सर्रास लूट सुरू असताना अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. प्रत्येक केंद्रावर ब्रिटीशकालीन कालबाह्य झालेल्या वजन काट्याऐवजी कृषी उत्पन्न बाजार समितीने धान खरेदी परवानाधारकांना इलेक्ट्रॉनिक काटे पुरविले.कृषी उत्पन्न बाजार समितच्या वडसा येथील यार्डमध्ये व्यापारी इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर करीत आहेत पण ग्रामीण भागातील हमीभाव खरेदी केंद्रांवर मात्र सर्रास लूट सुरू आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची धान विक्रीत होणारी ही लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सर्व धान खरेदी व्यावसायिक व हमीभाव केंद्रांना इलेक्ट्रॉनिक काटे पुरविले आहेत, जर साध्या हातकाट्याने धानाची खरेदी होत असेल तर ही शेतकऱ्यांची लूट आहे.- खिरसागर नाकाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, आरमोरी

टॅग्स :Farmerशेतकरी