शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

ड्रेनेजसाठी खोदलेले रस्ते ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस्ट ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३५ किमी अंतराची पाईपलाईन टाकून झाली आहे.

ठळक मुद्दे३५ किमीची पाईपलाईन पूर्ण : रस्ता दुरूस्ती केवळ तीन किलोमीटर, उन्हाळ्यात धूळ तर पावसाळ्यात चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरात गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या भूमिगत गटार लाईनच्या कामामुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहे. गटार लाईनचे काम अतिशय गतीने सुरू असले तरी या कामानंतर रस्त्यांच्या दुरूस्तीकडे मात्र कोणत्याच पदाधिकाऱ्याचे किंवा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ३५ किलोमीटरचे रस्ते खोदून पाईपलाईन टाकलेली असताना रस्त्यांची दुरूस्ती मात्र जेमतेम ३ किलोमीटर झाली आहे.गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस्ट ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३५ किमी अंतराची पाईपलाईन टाकून झाली आहे. या भूमिगत गटार लाईनसाठी जेसीबीने रस्ते खोदले आहेत. पाईप टाकण्यासाठी रस्ता अगदी मध्यभागातून खोदला जात आहे. रस्ता खोदतेवेळी माती अस्ताव्यस्त पसरत असल्याने काही डांबरी व सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना कच्च्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता. आता या रस्त्यांवरून धूळ उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास आणखी वाढला आहे.रस्ते दुरूस्तीची जबाबदारी कंत्राटदाराचीपाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ८ ते १५ दिवसांनी रस्ता पूर्वी होता तसा, म्हणजे डांबरी रस्ता असेल तर डांबरी आणि सिमेंटचा असल्यास पूर्वीप्रमाणे सिमेंटचा रस्ता तयार करण्याची जबाबदारी सदर कंत्राटदाराची आहे, असे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र कंत्राटदार त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. अनेक रस्त्यांवर रस्ता खोदल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मातीचे ढिग पसरले आहे. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. खोदलेल्या ३५ किमीच्या रस्त्यांपैकी दोन ते तीनच किमी रस्त्यांची दुरूस्ती कंत्राटदाराने केली आहे. या रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट होणार आहे. ज्या गतीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे, त्याच गतीने दुरूस्तीचे कामही करावे, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास खोदलेल्या भागात मोठमोठी वाहने फसण्याचा तसेच चिखलाचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा