शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ड्रेनेजसाठी खोदलेले रस्ते ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस्ट ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३५ किमी अंतराची पाईपलाईन टाकून झाली आहे.

ठळक मुद्दे३५ किमीची पाईपलाईन पूर्ण : रस्ता दुरूस्ती केवळ तीन किलोमीटर, उन्हाळ्यात धूळ तर पावसाळ्यात चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरात गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या भूमिगत गटार लाईनच्या कामामुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहे. गटार लाईनचे काम अतिशय गतीने सुरू असले तरी या कामानंतर रस्त्यांच्या दुरूस्तीकडे मात्र कोणत्याच पदाधिकाऱ्याचे किंवा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ३५ किलोमीटरचे रस्ते खोदून पाईपलाईन टाकलेली असताना रस्त्यांची दुरूस्ती मात्र जेमतेम ३ किलोमीटर झाली आहे.गडचिरोली शहरात भूमिगत गटार लाईन टाकण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शहरातून सुमारे १०२ किमीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून भूमिगत गटार लाईनच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळा संपल्यानंतर कामाने गती पकडली. ऑगस्ट ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३५ किमी अंतराची पाईपलाईन टाकून झाली आहे. या भूमिगत गटार लाईनसाठी जेसीबीने रस्ते खोदले आहेत. पाईप टाकण्यासाठी रस्ता अगदी मध्यभागातून खोदला जात आहे. रस्ता खोदतेवेळी माती अस्ताव्यस्त पसरत असल्याने काही डांबरी व सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना कच्च्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता. आता या रस्त्यांवरून धूळ उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास आणखी वाढला आहे.रस्ते दुरूस्तीची जबाबदारी कंत्राटदाराचीपाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ८ ते १५ दिवसांनी रस्ता पूर्वी होता तसा, म्हणजे डांबरी रस्ता असेल तर डांबरी आणि सिमेंटचा असल्यास पूर्वीप्रमाणे सिमेंटचा रस्ता तयार करण्याची जबाबदारी सदर कंत्राटदाराची आहे, असे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र कंत्राटदार त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. अनेक रस्त्यांवर रस्ता खोदल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मातीचे ढिग पसरले आहे. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. खोदलेल्या ३५ किमीच्या रस्त्यांपैकी दोन ते तीनच किमी रस्त्यांची दुरूस्ती कंत्राटदाराने केली आहे. या रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट होणार आहे. ज्या गतीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे, त्याच गतीने दुरूस्तीचे कामही करावे, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास खोदलेल्या भागात मोठमोठी वाहने फसण्याचा तसेच चिखलाचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा