शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

झाडे कोसळल्याने मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

छत्तीसगड राज्यातून येणारी वाहने याच मार्गाने येतात. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गाने ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. कोसळलेली झाडे कायम असल्याने दुचाकी,चारचाकी तसेच अवजड वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सदर झाडे हटविण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देरांगी-धानोरा मार्र्ग : परिसरातील वाहनधारक त्रस्त; जपतलाईमार्गे सुरू आहे वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : रांगी-धानोरा हा राज्यमार्ग असल्याने येथून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मागील आठवड्यात वादळी पाऊस झाला. या पावसामुळे मार्गावर परिसरात ठिकठिकाणी झाडे कोसळली. मोहली ते पुसावंडी दरम्यान तीन झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. सदर झाडे अद्यापही हटविण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना धानोरा-जपतलाई-मोहली या मार्गाने जावे लागत आहे.छत्तीसगड राज्यातून येणारी वाहने याच मार्गाने येतात. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गाने ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. कोसळलेली झाडे कायम असल्याने दुचाकी,चारचाकी तसेच अवजड वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सदर झाडे हटविण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या हा मार्ग बंद झाला असून या मार्गाची वाहतूक धानोरा-जपतलाई-मोहली या मार्गाने करावी लागत आहे.यात प्रवासी व वाहनधारकांना अधिकचा फेरा होत आहे. परिणामी अधिकचे इंधन खर्च होत आहे. त्यामुळे या मार्गावरील झाडे हटवून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अर्धवट डांबरीकरण निमगाव मार्ग खड्डेमयधानोरा तालुक्यातील रांगी ते निमगाव मार्गावर बोरी फाट्यापासून निमगावपर्यंत दोन किमी माार्गाचे मार्च महिन्यातच डांबरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. अपूर्ण बांधकामामुळे सध्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील आठ वर्षांपासून या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्षच झाले.रांगी ते निमगावपर्यंतचे अंतर ४ किलोमीटर आहे. बोरी फाट्यापासून निमगावपर्यंतचे अंतर २ किमी आहे. मात्र या मार्गावर अर्धवट डांबरीकरण केले आहे. उर्वरित रस्ता तसाच सोडून दिला आहे. डांबरीकरण न झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहात असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांतील खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. गंभीर अपघात घडण्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केलीआहे.

टॅग्स :Rainपाऊस