शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

वाढत्या महागाईने तेल ओतले; सर्वांच्याच घरातले बजेट बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:44 AM

गडचिराेली : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ केली. खाद्यतेलासह आवश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वधारल्याने सर्वसामान्य कुटुंबांना संसाराचा ...

गडचिराेली : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ केली. खाद्यतेलासह आवश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वधारल्याने सर्वसामान्य कुटुंबांना संसाराचा गाडा चालविताना घाम फुटत आहे. वाढत्या महागाईने चांगलेच तेल ओतल्यामुळे घरातले आर्थिक बजेट बिघडले आहे.

विविध प्रकारचे खाद्यतेल, धान्य, शेंगदाणे, साखर, साबुदाणा, चहापत्ती, डाळ तसेच गॅस सिलिंडर, पेट्राेल व डिझेलची दरवाढ अनेकदा झाली. दरवाढीमुळे तीन ते पाच सदस्य असलेल्या कुटुंबांचा महिन्याचा खर्च वाढला. प्रत्येक कुटुंबाचा महिन्याकाठीचा चार ते पाच हजार रुपयांचा खर्च वाढला आहे.

देशात खाद्यतेलाला माेठी मागणी असते. काेणताही पदार्थ बनवायचा झाला तर तेलाशिवाय पर्याय नसताे. तसेच सण-समारंभ तसेच विविध प्रकारच्या कार्यक्रमांत खाद्यतेल व डाळींचा वापर माेठ्या प्रमाणात केला जाताे. सूर्यफूल, शेंगदाणा, साेयाबीन, पामतेल, जवस आदी खाद्यतेलाचा वापर कुटुंब करीत असतात. याशिवाय दरराेज साखर, चहापत्ती आदींची गरज भासते. या सर्व वस्तूंच्या भावात गेल्या पाच-सहा महिन्याच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वांच्याच खर्चाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी पाच हजार रुपयांत महिनाभराचा किराणा हाेत हाेता. आता तेवढ्याच किराणा साहित्याला एका कुटुंबाला सात हजार रुपये लागत आहेत.

बाॅक्स .....

असे आहेत सद्यस्थितीत दर

सद्यस्थितीत गडचिराेली शहरातील किराणा दुकानांमध्ये शेंगदाणा तेल प्रतिकिलाे १७० रुपये, साेयाबीन तेल १५० रुपये, शेंगदाणे १२० रुपये साखर ४० रुपये, साबुदाणा ८० रुपये किलाे, चहापत्ती ३८० रुपये किलाे दराने विकल्या जात आहे. याशिवाय विविध प्रकारच्या डाळींचेही भाव वधारले आहेत. यामध्ये तूरडाळ १२० रुपये किलाे, उडीदडाळ तसेच मूगडाळ १२० तसेच हरभरा डाळ ८० रुपये किलाे दराने विकली जात आहे. सध्या गॅस सिलिंडरसाठी ९१० रुपये माेजावे लागत आहेत.