शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

रेशन दुकानांमध्ये होतोय कणीमिश्रित तांदूळ पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:01 IST

आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामुळे चांगल्या तांदळात वरून कणी मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. निरीक्षण अधिकारी, गोदाम व्यवस्थापकांना हाताशी धरून हा भेसळीचा कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.

ठळक मुद्देपुरवठ्याचे गौडबंगाल : राईस मिलिंगमधूनच होत आहे गडबड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामुळे चांगल्या तांदळात वरून कणी मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. निरीक्षण अधिकारी, गोदाम व्यवस्थापकांना हाताशी धरून हा भेसळीचा कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.गेल्या हंगामातील धानाच्या विक्रमी उत्पादनामुळे यावर्षी राईस मिलर्सना सुगीचे दिवस आले आहेत. भरडाईसाठी आदिवासी विकास महामंडळाकडून तांदळाचे लॉट देताना काही मिलर्सना झुकते माप दिले जात असल्याच्या तक्रारी झाल्या. परंतू त्यानंतरही या प्रकाराला आळा घालण्यात पुरवठा विभागाला यश आलेले नाही. त्यातच भेसळयुक्त तांदळाचे लॉट सर्रास पास करून ते गोरगरीब रेशनकार्डधारकांच्या माथी मारण्याच्या प्रकाराला ऊत आला आहे.निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक यांच्यापासून सर्वच जण राईस मिलर्सच्या दावणीला बांधल्याप्रमाणे निमूटपणे हे सर्व सहन करत असल्यामुळे शंका-कुशंकांना वाव मिळत आहे. वरिष्ठ अधिकारी दौºयावर दौरे करीत असले तरी धान्य पुरवठ्यातील गडबडीकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.‘नवसंजीवनी’च्या धान्य पुरवठ्याची तपासणी करारस्ते आणि पुलांअभावी यावर्षीही पावसाला सुरूवात झाल्यानंतर २२३ गावांचे मार्ग बंद होऊन तीन ते चार महिने त्या गावांचा संपर्क तुटणार आहे. त्या सर्व गावांमध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत ४ महिन्यांचा धान्य पुरवठा मे अखेरपर्यंत करण्यात आल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. परंतू बहुतांश रेशन दुकानदारांकडे ४ महिन्यांचे धान्य साठवून ठेवण्याएवढी जागाच नाही. अशा स्थितीत खरंच तेवढा पुरवठा त्या गावांमध्ये झाला का, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या धान्य पुरवठ्याचे वरिष्ठ स्तरावरून उलटतपासणी करण्याची मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.चांगल्या तांदळात आणि कणीत फरकअधिक नफा कमविण्याच्या नादात चांगल्या तांदळात तुटका तांदूळ (कणी) मिसळली जात आहे. विशेष म्हणजे पोत्यांमधील चांगला तांदूळ आणि त्यात असलेली कणी एकाच जातीचे नसून त्यात फरक आढळत आहे. त्यामुळे पोत्यांच्या वाहतुकीदरम्यान तांदूळ तुटल्याचे कारण समोर केल्यास ते खोटे ठरणार आहे. तांदूळ आणि कणी यांच्यातील फरक पाहता तांदळात मुद्दाम कणी मिसळल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्या कणीच्या बदल्यात वाचणारा चांगला तांदूळ मिलमालक परस्पर विकून अधिक नफा कमवत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू असलेला हा खेळ बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.