शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानांमध्ये होतोय कणीमिश्रित तांदूळ पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:01 IST

आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामुळे चांगल्या तांदळात वरून कणी मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. निरीक्षण अधिकारी, गोदाम व्यवस्थापकांना हाताशी धरून हा भेसळीचा कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.

ठळक मुद्देपुरवठ्याचे गौडबंगाल : राईस मिलिंगमधूनच होत आहे गडबड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामुळे चांगल्या तांदळात वरून कणी मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. निरीक्षण अधिकारी, गोदाम व्यवस्थापकांना हाताशी धरून हा भेसळीचा कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.गेल्या हंगामातील धानाच्या विक्रमी उत्पादनामुळे यावर्षी राईस मिलर्सना सुगीचे दिवस आले आहेत. भरडाईसाठी आदिवासी विकास महामंडळाकडून तांदळाचे लॉट देताना काही मिलर्सना झुकते माप दिले जात असल्याच्या तक्रारी झाल्या. परंतू त्यानंतरही या प्रकाराला आळा घालण्यात पुरवठा विभागाला यश आलेले नाही. त्यातच भेसळयुक्त तांदळाचे लॉट सर्रास पास करून ते गोरगरीब रेशनकार्डधारकांच्या माथी मारण्याच्या प्रकाराला ऊत आला आहे.निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक यांच्यापासून सर्वच जण राईस मिलर्सच्या दावणीला बांधल्याप्रमाणे निमूटपणे हे सर्व सहन करत असल्यामुळे शंका-कुशंकांना वाव मिळत आहे. वरिष्ठ अधिकारी दौºयावर दौरे करीत असले तरी धान्य पुरवठ्यातील गडबडीकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.‘नवसंजीवनी’च्या धान्य पुरवठ्याची तपासणी करारस्ते आणि पुलांअभावी यावर्षीही पावसाला सुरूवात झाल्यानंतर २२३ गावांचे मार्ग बंद होऊन तीन ते चार महिने त्या गावांचा संपर्क तुटणार आहे. त्या सर्व गावांमध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत ४ महिन्यांचा धान्य पुरवठा मे अखेरपर्यंत करण्यात आल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. परंतू बहुतांश रेशन दुकानदारांकडे ४ महिन्यांचे धान्य साठवून ठेवण्याएवढी जागाच नाही. अशा स्थितीत खरंच तेवढा पुरवठा त्या गावांमध्ये झाला का, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या धान्य पुरवठ्याचे वरिष्ठ स्तरावरून उलटतपासणी करण्याची मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.चांगल्या तांदळात आणि कणीत फरकअधिक नफा कमविण्याच्या नादात चांगल्या तांदळात तुटका तांदूळ (कणी) मिसळली जात आहे. विशेष म्हणजे पोत्यांमधील चांगला तांदूळ आणि त्यात असलेली कणी एकाच जातीचे नसून त्यात फरक आढळत आहे. त्यामुळे पोत्यांच्या वाहतुकीदरम्यान तांदूळ तुटल्याचे कारण समोर केल्यास ते खोटे ठरणार आहे. तांदूळ आणि कणी यांच्यातील फरक पाहता तांदळात मुद्दाम कणी मिसळल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्या कणीच्या बदल्यात वाचणारा चांगला तांदूळ मिलमालक परस्पर विकून अधिक नफा कमवत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू असलेला हा खेळ बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.