शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

रेशन दुकानांमध्ये होतोय कणीमिश्रित तांदूळ पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:01 IST

आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामुळे चांगल्या तांदळात वरून कणी मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. निरीक्षण अधिकारी, गोदाम व्यवस्थापकांना हाताशी धरून हा भेसळीचा कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.

ठळक मुद्देपुरवठ्याचे गौडबंगाल : राईस मिलिंगमधूनच होत आहे गडबड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामुळे चांगल्या तांदळात वरून कणी मिसळून भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. निरीक्षण अधिकारी, गोदाम व्यवस्थापकांना हाताशी धरून हा भेसळीचा कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.गेल्या हंगामातील धानाच्या विक्रमी उत्पादनामुळे यावर्षी राईस मिलर्सना सुगीचे दिवस आले आहेत. भरडाईसाठी आदिवासी विकास महामंडळाकडून तांदळाचे लॉट देताना काही मिलर्सना झुकते माप दिले जात असल्याच्या तक्रारी झाल्या. परंतू त्यानंतरही या प्रकाराला आळा घालण्यात पुरवठा विभागाला यश आलेले नाही. त्यातच भेसळयुक्त तांदळाचे लॉट सर्रास पास करून ते गोरगरीब रेशनकार्डधारकांच्या माथी मारण्याच्या प्रकाराला ऊत आला आहे.निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक यांच्यापासून सर्वच जण राईस मिलर्सच्या दावणीला बांधल्याप्रमाणे निमूटपणे हे सर्व सहन करत असल्यामुळे शंका-कुशंकांना वाव मिळत आहे. वरिष्ठ अधिकारी दौºयावर दौरे करीत असले तरी धान्य पुरवठ्यातील गडबडीकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.‘नवसंजीवनी’च्या धान्य पुरवठ्याची तपासणी करारस्ते आणि पुलांअभावी यावर्षीही पावसाला सुरूवात झाल्यानंतर २२३ गावांचे मार्ग बंद होऊन तीन ते चार महिने त्या गावांचा संपर्क तुटणार आहे. त्या सर्व गावांमध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत ४ महिन्यांचा धान्य पुरवठा मे अखेरपर्यंत करण्यात आल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. परंतू बहुतांश रेशन दुकानदारांकडे ४ महिन्यांचे धान्य साठवून ठेवण्याएवढी जागाच नाही. अशा स्थितीत खरंच तेवढा पुरवठा त्या गावांमध्ये झाला का, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या धान्य पुरवठ्याचे वरिष्ठ स्तरावरून उलटतपासणी करण्याची मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.चांगल्या तांदळात आणि कणीत फरकअधिक नफा कमविण्याच्या नादात चांगल्या तांदळात तुटका तांदूळ (कणी) मिसळली जात आहे. विशेष म्हणजे पोत्यांमधील चांगला तांदूळ आणि त्यात असलेली कणी एकाच जातीचे नसून त्यात फरक आढळत आहे. त्यामुळे पोत्यांच्या वाहतुकीदरम्यान तांदूळ तुटल्याचे कारण समोर केल्यास ते खोटे ठरणार आहे. तांदूळ आणि कणी यांच्यातील फरक पाहता तांदळात मुद्दाम कणी मिसळल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्या कणीच्या बदल्यात वाचणारा चांगला तांदूळ मिलमालक परस्पर विकून अधिक नफा कमवत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू असलेला हा खेळ बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.