शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

श्रमदानातून पूल दुरूस्ती

By admin | Updated: July 12, 2015 02:00 IST

रस्ता व पुलाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोठी व नारगुंडा येथील नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या सहकार्याने पुलांची दुरूस्ती केली.

प्रशासनाचे दुर्लक्ष : कोठी, नारगुंडा गावातील नागरिक व पोलिसांचे सहकार्यभामरागड : रस्ता व पुलाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोठी व नारगुंडा येथील नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या सहकार्याने पुलांची दुरूस्ती केली. कोठी हे गाव भामरागड तालुकास्थळापासून सुमारे १८ किमी अंतरावर आहे. कोठीच्या पलिकडेही अनेक गावे आहेत. कोठी येथे आश्रमशाळा असल्याने सभोवतालच्या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दरदिवशी ये-जा करतात. त्याचबरोबर कोठी हे परिसरातील मोठे गाव असल्याने इतर कामासाठीही नागरिक कोठी येथे येतात. भामरागड या तालुकास्थळावरही कोठी परिसरातील अनेक नागरिक जातात. कोठी गावाजवळ नाला असून या नाल्यावर कमी उंचीचा व रुंदीचा पूल आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुलावरून तसेच पुलाच्या दोन्ही बाजुने पाणी वाहते. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या बाजुची माती वाहून जाते. त्यामुळे पूल व रस्ता यांच्यामध्ये भलामोठा खड्डा पडते. उन्हाळ्यामध्येच कोठी येथील गावकरी व कोठी पोलीस मदत केंद्राच्या जवानांनी पुलाच्या बाजुला माती टाकून रस्ता सुरळीत केला होता. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर माती वाहून गेली. त्यामुळे त्याच जागेवर आणखी मोठा खड्डा पडला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही खड्डा बुजविण्यास तयार नसल्याने नागरिक व पोलीस मदत केंद्राच्या जवानांनी श्रमदानातून खड्डा बुजविला व मार्ग सुरळीत केला. पाणी आल्यानंतर त्यावरील माती वाहून जाणे ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास तयार नाही. पुलावरून पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतुकही अनेक दिवस खोळंबते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)नारगुंडा नाल्यावरील बायपास मार्गावर टाकली मातीनारगुंडा नाल्यावरील पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर पूल अजूनही पूर्ण झाला नाही. वाहनांना जाण्यासाठी बायपास मार्ग तयार करण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात बायपास मार्ग पाण्यामुळे वाहून गेला. रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने नारगुंडा येथील नागरिक व पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी संयुक्त अभियान राबवून सदर बायपास मार्ग दुरूस्त केला. पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत असली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.