शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

श्रमदानातून पूल दुरूस्ती

By admin | Updated: July 12, 2015 02:00 IST

रस्ता व पुलाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोठी व नारगुंडा येथील नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या सहकार्याने पुलांची दुरूस्ती केली.

प्रशासनाचे दुर्लक्ष : कोठी, नारगुंडा गावातील नागरिक व पोलिसांचे सहकार्यभामरागड : रस्ता व पुलाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोठी व नारगुंडा येथील नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या सहकार्याने पुलांची दुरूस्ती केली. कोठी हे गाव भामरागड तालुकास्थळापासून सुमारे १८ किमी अंतरावर आहे. कोठीच्या पलिकडेही अनेक गावे आहेत. कोठी येथे आश्रमशाळा असल्याने सभोवतालच्या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दरदिवशी ये-जा करतात. त्याचबरोबर कोठी हे परिसरातील मोठे गाव असल्याने इतर कामासाठीही नागरिक कोठी येथे येतात. भामरागड या तालुकास्थळावरही कोठी परिसरातील अनेक नागरिक जातात. कोठी गावाजवळ नाला असून या नाल्यावर कमी उंचीचा व रुंदीचा पूल आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुलावरून तसेच पुलाच्या दोन्ही बाजुने पाणी वाहते. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या बाजुची माती वाहून जाते. त्यामुळे पूल व रस्ता यांच्यामध्ये भलामोठा खड्डा पडते. उन्हाळ्यामध्येच कोठी येथील गावकरी व कोठी पोलीस मदत केंद्राच्या जवानांनी पुलाच्या बाजुला माती टाकून रस्ता सुरळीत केला होता. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर माती वाहून गेली. त्यामुळे त्याच जागेवर आणखी मोठा खड्डा पडला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही खड्डा बुजविण्यास तयार नसल्याने नागरिक व पोलीस मदत केंद्राच्या जवानांनी श्रमदानातून खड्डा बुजविला व मार्ग सुरळीत केला. पाणी आल्यानंतर त्यावरील माती वाहून जाणे ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास तयार नाही. पुलावरून पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतुकही अनेक दिवस खोळंबते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)नारगुंडा नाल्यावरील बायपास मार्गावर टाकली मातीनारगुंडा नाल्यावरील पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर पूल अजूनही पूर्ण झाला नाही. वाहनांना जाण्यासाठी बायपास मार्ग तयार करण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात बायपास मार्ग पाण्यामुळे वाहून गेला. रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने नारगुंडा येथील नागरिक व पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी संयुक्त अभियान राबवून सदर बायपास मार्ग दुरूस्त केला. पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत असली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.