शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

हत्याकांडप्रकरणी मूक मोर्चातून राेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 22:50 IST

मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशाल याच्याशी जवळीक वाढली. त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचे असेल तर आशिषला कायमचे दूर करावे लागेल, असे तिने सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहरातील बहुचर्चित आंबेडकर वाॅर्डातील आशिष रवी मेश्राम या युवकाची अनैतिक संबंधातून त्याच्या पत्नीसह इतर आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी शहरात मूक मोर्चा काढून या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात मृतकाची पत्नी सपना मेश्राम हिच्यासह इतर चार आरोपींना अटक झाल्याने एकूण आरोपींची संख्या ५ वर गेली आहे.  शहराच्या आंबेडकर वाॅर्डातील आशिष मेश्राम हा ११ ऑक्टोबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घरून मोटारसायकलने निघून गेल्यानंतर भगतसिंग वाॅर्ड ते तुकुम वाॅर्ड मार्गावरील कालव्यात दि. १२ ला सकाळी त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. घटनेनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी विशाल रामभाऊ रेखडे (वय २४) या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याला बोलते केले. त्याने या प्रकरणाशी संबंधित शहराच्या कस्तुरबा वॉर्डातील निकेश पितांबर अलोणे ऊर्फ नाऱ्या (वय २२), देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील दुर्गेश देवानंद गाधाडे (२२) तसेच आंबेडकर वाॅर्डातील संतोष लेकचंद मेश्राम (२२) या तीन आरोपींना १४ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर या हत्याकांडात मृत आशिषच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली. माेर्चात शहराच्या विविध वाॅर्डातील नागरिक सहभागी झाले हाेते. 

जुने संबंध पुन्हा बहरले आणि केली हत्या-    या प्रकरणातील चार आरोपींना अटक करून बोलते केल्यानंतर हे प्रकरण अनैतिक संबंधातून घडले असल्याचे समोर येऊ लागले. दरम्यान मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशाल याच्याशी जवळीक वाढली. त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचे असेल तर आशिषला कायमचे दूर करावे लागेल, असे तिने सांगितले. त्यातूनच या हत्याकांडाचा कट शिजल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

मनमिळाऊ आणि शांत आशिषमुळे लोक रस्त्यावरदरम्यान, ही गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच शांत व मनमिळाऊ स्वभावाचा असलेल्या आशिष मेश्राम यांचा अनैतिक संबंधातून पत्नीनेच हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येऊ लागल्याने एरव्ही शांत असलेले देसाईगंज शहर पुरते  हादरले. यामुळे संतप्त शहरवासीयांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आशिषच्या हत्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत शहराच्या मुख्य मार्गांवरून मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी