शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हत्याकांडप्रकरणी मूक मोर्चातून राेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 22:50 IST

मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशाल याच्याशी जवळीक वाढली. त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचे असेल तर आशिषला कायमचे दूर करावे लागेल, असे तिने सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहरातील बहुचर्चित आंबेडकर वाॅर्डातील आशिष रवी मेश्राम या युवकाची अनैतिक संबंधातून त्याच्या पत्नीसह इतर आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी शहरात मूक मोर्चा काढून या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात मृतकाची पत्नी सपना मेश्राम हिच्यासह इतर चार आरोपींना अटक झाल्याने एकूण आरोपींची संख्या ५ वर गेली आहे.  शहराच्या आंबेडकर वाॅर्डातील आशिष मेश्राम हा ११ ऑक्टोबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घरून मोटारसायकलने निघून गेल्यानंतर भगतसिंग वाॅर्ड ते तुकुम वाॅर्ड मार्गावरील कालव्यात दि. १२ ला सकाळी त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. घटनेनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी विशाल रामभाऊ रेखडे (वय २४) या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याला बोलते केले. त्याने या प्रकरणाशी संबंधित शहराच्या कस्तुरबा वॉर्डातील निकेश पितांबर अलोणे ऊर्फ नाऱ्या (वय २२), देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथील दुर्गेश देवानंद गाधाडे (२२) तसेच आंबेडकर वाॅर्डातील संतोष लेकचंद मेश्राम (२२) या तीन आरोपींना १४ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर या हत्याकांडात मृत आशिषच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली. माेर्चात शहराच्या विविध वाॅर्डातील नागरिक सहभागी झाले हाेते. 

जुने संबंध पुन्हा बहरले आणि केली हत्या-    या प्रकरणातील चार आरोपींना अटक करून बोलते केल्यानंतर हे प्रकरण अनैतिक संबंधातून घडले असल्याचे समोर येऊ लागले. दरम्यान मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशाल याच्याशी जवळीक वाढली. त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचे असेल तर आशिषला कायमचे दूर करावे लागेल, असे तिने सांगितले. त्यातूनच या हत्याकांडाचा कट शिजल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

मनमिळाऊ आणि शांत आशिषमुळे लोक रस्त्यावरदरम्यान, ही गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच शांत व मनमिळाऊ स्वभावाचा असलेल्या आशिष मेश्राम यांचा अनैतिक संबंधातून पत्नीनेच हत्याकांड घडवून आणल्याचे समोर येऊ लागल्याने एरव्ही शांत असलेले देसाईगंज शहर पुरते  हादरले. यामुळे संतप्त शहरवासीयांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आशिषच्या हत्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत शहराच्या मुख्य मार्गांवरून मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी