शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सत्तेसाठी जातीच्या सीमारेषा पुसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:59 IST

निवडणुकीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याने एक विशिष्ट जात ही अल्पसंख्यांक ठरते. त्यामुळे एका जातीच्या भरवशावर उमेदवार कधीच निवडून येत नाही. बहुजन समाजाला सत्ता मिळवायची असेल तर जातीमधील सीमारेषा पुसून या समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देअंजली आंबेडकर यांचे प्रतिपादन : भारिप बहुजन महासंघाचा महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणुकीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याने एक विशिष्ट जात ही अल्पसंख्यांक ठरते. त्यामुळे एका जातीच्या भरवशावर उमेदवार कधीच निवडून येत नाही. बहुजन समाजाला सत्ता मिळवायची असेल तर जातीमधील सीमारेषा पुसून या समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तशी राजकीय जागृती बहुजन समाजामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले.भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात शुक्रवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. आंबेडकर उपस्थित होत्या. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या राज्य संघटिका रेखा ठाकूर, डॉ.निशा शेंडे, अरूंधती सिरसाट उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माला भजगवडी, स्वागताध्यक्ष डॉ.खुशबू दुर्गे, उपाध्यक्ष ज्योती दहिकर, उपाध्यक्ष ज्योती दहिकर, संगीता मेश्राम, डॉ.धम्मसंगिनी, शहनाज पठाण, सुरेखा बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा. आंबेडकर म्हणाल्या, बाबासाहेबांनी मोठ्या संघर्षाने बहुजन समाजाला हक्क प्राप्त करून दिले. मात्र दुसऱ्याला मतदान करून आपण स्वत:च्या हक्कांवर गदा आणत आहोत. जोपर्यंत बहुजन समाजातील सर्व जाती एकत्र येत नाही, तोपर्यंत बहुजन समाजाचा उमेदवार विजयी होणार नाही. आपला समाज स्वत:च्या अधिकारांविषयी जागृत झाला आहे. ही जागृती आदिवासींसह इतर समाजामध्येही निर्माण करणे आवश्यक आहे. येथील आदिवासींच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या, जेणेकरून आदिवासी समाजही आपल्यासोबत जोडण्यास मदत होईल. शासनाने सुमारे २९ बिलियन रूपये खर्च करून सरदार पटेल यांचा पुतळा उभारला आहे. पुतळे उभारण्यापेक्षा मनुष्यबळ विकासाची कामे होणे आवश्यक होते. आंतरराष्ट्रीयस्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकार मात्र पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवत आहे. त्यामुळे जनता हैराण आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. कार्यक्रमादरम्यान रेखा ठाकूर, डॉ.निशा शेंडे, अरूंधती सिरसाट यांनीही मार्गदर्शन केले.संचालन भाग्यश्री मेश्राम, प्रास्ताविक उज्ज्वला साखरे यांनी केले. यशस्वीतेसाठी सपना रामटेके, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा प्रवक्ता बाळू टेंभूर्णे, विधानसभा अध्यक्ष जी.के.बारसिंगे, सिद्धार्थ भैसारे, मिलींद अंबादे यांनी सहकार्य केले. मेळाव्याला जवळपास दोन हजार महिला व पुरूष उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक