शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

रबी पिकांच्या उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट, वाल, बरबटी आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. यावर्षी रबी हंगामातील पिकांचे दाणे भरीत असताना वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस बरसला, गारपीट झाली. दोन ते तीनदा हे संकट गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आहे.

ठळक मुद्देलागवड खर्च माथी : कडधान्याचे उत्पादन कमी झाल्याने शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. येथील शेतकरी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेतात. सध्या रबी पिकाची काढणी आटोपली असून मळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रबी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट दिसून येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट, वाल, बरबटी आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. यावर्षी रबी हंगामातील पिकांचे दाणे भरीत असताना वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस बरसला, गारपीट झाली. दोन ते तीनदा हे संकट गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आहे. याचा फटका रबी हंगामातील कडधान्य व तेलवर्गीय पिकांना बसला. परिणामी यावर्षी उत्पादनामध्ये घट आल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यंदाच्या रबी हंगामात चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडधान्य पिकाची लागवड केली. विशेष म्हणजे, या तालुक्यात लाखोळी व तूर हे पीक प्राधान्याने घेतले जाते. सदर दोन्ही पिके ऐन गर्भात असताना ढगाळी वातावरणाचा फटका या पिकांना बसला. परिणामी कडधान्याचे उत्पादन २५ टक्के झाल्याचे तालुक्यातील अनेक शेतकºयांनी सांगितले आहे. मजुरांच्या मजुरीचा खर्च तसेच लागवडीचा इतर खर्च भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या वैरणाची व्यवस्था व्हावी, यासाठी अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील कडधान्य पिकाची मळणी केली. मळणीचाही खर्च वाढत असून यंदा रबी पीक लागवडीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथ्यावर बसला आहे.गावठी आंब्याची चव महागणारफेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्याच्या दुसºया व तिसºया आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. वादळासह गारपीट झाला. परिणामी आंब्याचा बहर गळून पडला. आमराईमध्ये आंबे गळून पडले. त्यामुळे यंदा गावठी आंब्याचे उत्पादन घटणार आहे. परिणामी यंदा गावठी आंब्याची चव महाग होणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक