शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

देशात शिक्षण व आरोग्यावर खर्च कमी

By admin | Updated: March 23, 2015 01:27 IST

माणसाच्या विकासासाठी सुदृढ व निरोगी शरीर तसेच शिक्षण महत्त्वाचे आहे. भारत देशात आरोग्यावर केवळ १.०४ टक्के खर्च केला जातो.

गडचिरोली : माणसाच्या विकासासाठी सुदृढ व निरोगी शरीर तसेच शिक्षण महत्त्वाचे आहे. भारत देशात आरोग्यावर केवळ १.०४ टक्के खर्च केला जातो. विकसित देशात शिक्षणावर १२.३१ टक्के निधी खर्च होणे आवश्यक आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या भांडवलशाही वृत्तीमुळे आपल्या देशात आरोग्य व शिक्षण या महत्त्वपूर्ण बाबीवर अत्यल्प निधी खर्च केला जात आहे, असे प्रतिपादन आयआयटी खरगपूरचे प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केले. भारत जन आंदोलन व अखील भारतीय आदिवासी महासभेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गडचिरोली येथील संस्कृती सभागृहात आयोजित जनसंघर्ष राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. तेलतुंबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हिरामण वरखडे होते. यावेळी मंचावर आदिवासी महासभेचे राज्याध्यक्ष हिरालाल येरमे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, परिषदेचे समन्वयक महेश राऊत आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. डॉ. तेलतुमडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी १९४४ मध्ये काही भांडलवादी मंडळींनी आपल्या हितासाठी मुंबई प्लान बनविला होता. त्यावेळी सरकारने या प्लानमधील तरतुदी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये समाविष्ट केल्या. तेव्हापासूनच कष्टकरी समाजाचे शोषण सुरू झाले. सत्ताधाऱ्यांनी भांडवलवाद, खासगीकरण, उदारमतवाद आदींच्या नावांवर दलित व आदिवासींना धोका दिला, अशी टीका डॉ. तेलतुंबडे यांनी केली. शोषण व्यवस्थेमुळेच अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्याची तीव्र भावना आता जनतेमध्ये निर्माण होत आहे. त्यासाठी योग्य नियोजनबध्द आंदोलन छेडण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक महेश राऊत, संचालन अ‍ॅड. जगदीश मेश्राम यांनी केले तर अभार हिरालाल येरमे यांनी मानले. भाकपाचे देवराव चवळे, विनोद झोडगे, जि.प. सदस्य अमोल मारकवार, प्रभू राजगडकर, गंगाराम आतला, छाया पोटावी, वासुदेव आतला, मनोहर तोरे आदीसह भारतीय जनआंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)