शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गडचिराेलीत 119 जाेडप्यांचा विक्रमी सामूहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केले. आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या उपवधूंची गडचिराेली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्या संख्येने विवाहाचा भव्य मंडप फुलून गेला होता. रविवारी सकाळी दहा वाजता भूमकांच्या मंत्रोच्चारात विवाह विधी पार पडले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने गडचिराेली येथे आयाेजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह साेहळ्यात जिल्हाभरातील ११९ आदिवासी जाेडपी विवाहबद्ध झाली. नातेवाईक, मान्यवर व भूमकांच्या मंत्राेच्चारात विवाह साेहळा गडचिराेली येथील लाॅनवर पार पडला.    पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केले. आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या उपवधूंची गडचिराेली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्या संख्येने विवाहाचा भव्य मंडप फुलून गेला होता. रविवारी सकाळी दहा वाजता भूमकांच्या मंत्रोच्चारात विवाह विधी पार पडले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाला आ. डाॅ. देवराव होळी, आ. कृष्णा गजभिये, एसपी अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पाेलीस अधीक्षक सोमय मुंडे, एसडीपीओ प्रनिल गिल्डा, एपीआय महादेव शेलार, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, जिल्हा बँक अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, मैत्री परिवारचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, बाळासाहेब वरखेडे, सुनील चिलेकर, निरंजन वासेकर, घिसुलाल काब्रा, डॉ. उपेंद्र कोठेकर, पंडित पुरके आदी उपस्थित हाेते.  पाेलीस विभाग नक्षली कारावायांना आळा घालण्याबराेबरच आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने झटत आहे. आदिवासी आमचेच कुटुंबीय असून त्यांना मदत करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे,संचालन प्रा. माधुरी यावलकर व महादेव शेलार तर आभार एसडीपीओ प्रनिल गिल्डा यांनी मानले. 

संसाराेपयाेगी साहित्य भेट

विवाहित जाेडप्यांना कपडे, पादत्राणे, संसारोपयोगी साहित्य, नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आदींचे वितरण करण्यात आले.धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, एटापल्ली, हेटरी, भामरागड, सिरोंचा व आत्मसमर्पित नक्षल्यांचे  असे एकुण १० झोन करण्यात आले होते.पोलिसांनी घरचाच विवाह असल्याच्या आनंदात मिरवणुकीत नाचण्याची हौस पूर्ण केली.विवाहासाठी भव्य मंडप उभारण्यात आला हाेता. अगाेदरच्या दिवशी आलेल्या जाेडप्यांची राहण्याची व्यवथा केली हाेती. 

मुलांनीही बघितला आई-वडिलांचा विवाह   काही जोडपी आधीपासूनच ‘लिव्ह-इन’ मध्ये राहत होती. त्यामुळे या आदिवासी जोडप्यांपैकी अनेकांना एक किंवा दोन मुले होती. त्यांची मुलेही त्यांच्या विवाहाची साक्षीदार ठरली. हा विवाह साेहळा संस्मरणीय ठरला.

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस