शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

सलोखा योजनेस दोन वर्षांनी मुदतवाढ; जमिनीचे वाद मिटल्यास शुल्क माफ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:42 IST

मुद्रांक सवलत १ जानेवारी २०२७ पर्यंत लागू : अत्यल्प शुल्क भरून करता येणार दस्त नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीच्या हिस्सेवाटणीवरून अनेकदा वाद उफाळून अप्रिय घटना घडतात. अशा घटनांना लगाम लावण्यासाठी शासनाकडून सलोखा योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून जमिनीचे वाद मिटविणाऱ्यांना अदलाबदल दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कातून माफी देण्यात येत आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही योजना दोन वर्षासाठी लागू करण्यात आली होती. शासनाने ७ एप्रिल रोजी या योजनेस पुन्हा दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून, १ जानेवारी २०२७पर्यंत योजना लागू असणार आहे.  

जमिनीच्या हिस्सेवाटणीवरून निर्माण झालेल्या वादाबाबतची अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मुख्यतः मालकी हक्क, शेतबांध, जमिनीचा ताबा, रस्ता, शेतजमीन मोजणी, अभिलेखातील चुकीच्या नोंदी, शेतीवरील अतिक्रमण, शेती वहिवाट, वाटणीचे वाद यासह इतर कारणांमुळे शेतजमिनीचे वाद होतात. शेतकऱ्यांचे आपसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन शांतता वाढीस लागण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे असेल तर अशा वेळी अदलाबदल दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येते. वादाच्या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क नाममात्र १ हजार रुपये व नोंदणी शुल्क नाममात्र १ हजार रुपये आकारून मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कामध्ये सवलत दिली जाते.

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध बदल करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. त्यांना अपेक्षित नियम असल्यास शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होईल.

वादाची प्रकरणेअनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन आणि न्यायालयामध्ये शेतीच्या वादाची लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शासनाकडून सलोखा योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेस जिल्ह्यातील तालुक्यांत शेतकऱ्यांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे.

कालावधी संपुष्टात

  • सलोखा योजनेतून वाद मिटविणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्यात येते. १ जानेवारी २०२३ मध्ये शासनाने योजनेत दस्त नोंदणी करताना पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात माफी देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेची मुदत १ जानेवारी २०२५ मध्ये संपुष्टात आली.
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कातील सवलत १ जानेवारी २०२७ पर्यंत योजना लागू असणार आहे.

७ एप्रिल सलोखा योजनेमुळे भांडण, तंटे मिटणार२०२५ रोजी शासन निर्णय जारी करून योजनेस २ वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले होते. योजनेच्या अंमलबजाणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली