शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

सलोखा योजनेस दोन वर्षांनी मुदतवाढ; जमिनीचे वाद मिटल्यास शुल्क माफ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:42 IST

मुद्रांक सवलत १ जानेवारी २०२७ पर्यंत लागू : अत्यल्प शुल्क भरून करता येणार दस्त नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीच्या हिस्सेवाटणीवरून अनेकदा वाद उफाळून अप्रिय घटना घडतात. अशा घटनांना लगाम लावण्यासाठी शासनाकडून सलोखा योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून जमिनीचे वाद मिटविणाऱ्यांना अदलाबदल दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कातून माफी देण्यात येत आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही योजना दोन वर्षासाठी लागू करण्यात आली होती. शासनाने ७ एप्रिल रोजी या योजनेस पुन्हा दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून, १ जानेवारी २०२७पर्यंत योजना लागू असणार आहे.  

जमिनीच्या हिस्सेवाटणीवरून निर्माण झालेल्या वादाबाबतची अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मुख्यतः मालकी हक्क, शेतबांध, जमिनीचा ताबा, रस्ता, शेतजमीन मोजणी, अभिलेखातील चुकीच्या नोंदी, शेतीवरील अतिक्रमण, शेती वहिवाट, वाटणीचे वाद यासह इतर कारणांमुळे शेतजमिनीचे वाद होतात. शेतकऱ्यांचे आपसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन शांतता वाढीस लागण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे असेल तर अशा वेळी अदलाबदल दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येते. वादाच्या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क नाममात्र १ हजार रुपये व नोंदणी शुल्क नाममात्र १ हजार रुपये आकारून मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कामध्ये सवलत दिली जाते.

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध बदल करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. त्यांना अपेक्षित नियम असल्यास शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होईल.

वादाची प्रकरणेअनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन आणि न्यायालयामध्ये शेतीच्या वादाची लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शासनाकडून सलोखा योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेस जिल्ह्यातील तालुक्यांत शेतकऱ्यांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे.

कालावधी संपुष्टात

  • सलोखा योजनेतून वाद मिटविणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्यात येते. १ जानेवारी २०२३ मध्ये शासनाने योजनेत दस्त नोंदणी करताना पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात माफी देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेची मुदत १ जानेवारी २०२५ मध्ये संपुष्टात आली.
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कातील सवलत १ जानेवारी २०२७ पर्यंत योजना लागू असणार आहे.

७ एप्रिल सलोखा योजनेमुळे भांडण, तंटे मिटणार२०२५ रोजी शासन निर्णय जारी करून योजनेस २ वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले होते. योजनेच्या अंमलबजाणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली