शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

पाणी प्रकल्पातून ४१ हजार प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:33 AM

गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देअरततोंडी ग्रामपंचायतीचा उपक्रम : एटीएमद्वारे पाच रूपयात २० लिटर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.सदर प्रकल्पांतर्गत एटीएम कार्डद्वारे पाच रूपयांत पिण्यासाठी २० लिटर थंड व शुध्द पाणी मिळत आहे. सदर पाण्याचे निर्जंतुकीकरणही केले जात आहे. सदर उपक्रमाबाबत या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी २०१५ मध्ये ग्रामसभेने पाणी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. पेसा अंतर्गत ग्रामसभा कोष समितीच्या पाच टक्के अबंध निधीतून सदर उपक्रमासाठी ४ लाख ९० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. मागील दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून हा पाणी प्रकल्प सुरू आहे. अरततोंडी गट ग्रामपंचायती अंतर्गत अरततोंडी, खरमतटोला व देऊळगाव येथील ३८९ कुटुंबातील २ हजार ११८ लोकांना हे शुध्द पाणी उपलब्ध होत आहे. २० लिटरची प्लास्टिक कॅन प्रत्येक कुटुंबासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज बिलाचा खर्च वाचविण्यासाठी सौरऊर्जेवर हा प्रकल्प यापुढे चालविण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक महेंद्र देशमुख यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई