शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

३० कोटी निधीचे पुनर्विनियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:45 IST

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेला अधिकाधिक निधी खर्च होऊन विकासाला गती मिळावी, या उद्देशाने सुमारे ३० कोटी ७ लाख रूपये निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सभा : आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निधी खर्च करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेला अधिकाधिक निधी खर्च होऊन विकासाला गती मिळावी, या उद्देशाने सुमारे ३० कोटी ७ लाख रूपये निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले. कामांना गती देऊन सदर निधी आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गुरूवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या.जिल्हा नियोजन समितीची २०१७-१८ च्या निधी पुनर्विनियोजन निश्चित बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शान्तनू गोयल आदी उपस्थित होते.सभेच्या सुरूवातीला २०१७-१८ च्या जिल्हा वार्षीक योजनेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शासनाने दिलेल्या सूचनानुसार केंद्र पुरस्कृत योजना वगळता इतर सर्व योजनांमधून महसुली लेख्यातून ३० टक्के व भांडवली लेख्यातून २० टक्के निधी वजा करून नियतव्यय मंजूर करण्यात आले. त्यानुसार सर्वसाधारण योजनेसाठी ११२ कोटी ६५ लाख २४ हजारांचा नियतव्यय, आदिवासी योजनेसाठी १०३ कोटी ३ लाख २८ हजार, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील करिता १९ कोटी ४ लाख १७ हजार व अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १६ कोटी ६३ लाख २२ हजारांचा नियतव्यय मंजूर आहे. प्राप्त झालेला नियतव्यय आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी खर्च होणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ आता दोन महिने शिल्लक असल्याने ज्या विभागांकडे मोठ्या प्रमाणात निधी पडून आहे. त्या निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले.जिल्हा विकासाच्या वाटेवर गतीमान कसा होईल यासाठी ही बैठक आहे. यात सर्वांनी आपले योगदान द्यावे. चांगले आणि वेगळेपणाने काम कसे करता येईल याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा असे मार्गदर्शन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. जिल्ह्यात १२ उपसा जलसिंचन योजना बंद अवस्थेत आहेत. या सर्व सौर उर्जेवर सुरू कराव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. प्रस्ताव लवकर पाठवा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.जिल्ह्यात जी कामे पूर्ण झाली आहेत त्या कामाच्या ठिकाणी माहिती दर्शक फलक नाहीत असा मुद्दा आमदार डॉ. देवराव होळी यांनी चर्चेत मांडला होता. या स्वरुपाचे फलक लावण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी टी. एस. तिडके यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त आणि त्यावरील अनुपालन अहवाल सादर केला.२७२९८.६३ लक्ष रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी२०१८-१९ चा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणांनी एकूण ७९६४३.१७ लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र शासनाने केवळ २७२९८.६३ लक्ष रूपयांची कमाल आर्थिक मर्यादा कळविली आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने २७२९८.६३ लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिली आहे. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी १३७८५.०० लक्ष, आदिवासी उपयोजनेसाठी २३४९५.४२ लक्ष, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी ३४६.३६ लक्ष, अनुसूचित जाती योजनेसाठी ३३१९.०० लक्ष इतका नियतव्यय ठेवण्यात आला आहे. अधिकची मागणी सुमारे ३८६९०.४४ लक्ष रूपये आहे. एवढा निधी मंजूर करावा, यासाठी ७ फेब्रुवारी २०१८ रोजी नागपूर येथे होणाºया राज्यस्तरीय बैठकीत मागणी केली जाईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.वीज अधिकाऱ्यांचे कौतुकजिल्ह्यात २६७ गावे अंधारात होती. त्यापैकी ११८ गावात विद्युत पुरवठा सुरु झाला. याबद्दल वीज अधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. या अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेऊन इतरांनी काम करावे, असे पालकमंत्री म्हणाले.महिला रूग्णालयासाठी दोन कोटींचा निधी मिळालासर्वसाधारण योजनेमध्ये एकूण ९४१.५८८ लक्ष बचत आहे. त्यापैकी २०० लाख रूपये महिला व बाल रूग्णालयाचे बांधकाम तसेच विस्तारीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शौचालय बांधकामासाठी ७००.८८ लक्ष रूपये, कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ३३ लाख रूपये व पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधी पुरविण्यासाठी ७.७० लाख रूपयांचे पुनर्विनियोजन करण्यात आले आहे.अनुसूचित जाती उपयोजनेचे १५.६८ लक्ष रूपये मागासवर्गीय वसतिगृहांना सहायक अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी वापरले जाणार आहेत.आदिवासी उपयोजनेतील २०४९.५२ लक्ष रूपये बचतीचेही पुनर्विनियोजन करण्यात आले. यामध्ये आरोग्य सेवेसाठी १७६३.०१, सेवेसाठी १३१.१४ लक्ष, आदिवासी रोजगारभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सावत्रीकरण करण्यासाठी १४२.७६ लाख, वनांसाठी १४.१५ लाख रूपये तर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाचे बळकटीकरण करण्यासाठी ३.३६ लाख रूपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा सर्व निधी आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.निधीचे पुनर्विनियोजन केल्यानंतर निधी खर्च होण्याला गती मिळेल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.