शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

शतक पार केलेले काहार समाजाचे रक्षाबंधन

By admin | Updated: September 1, 2015 01:29 IST

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा रक्षाबंधन उत्सव देशभर सर्वत्र साजरा केला जातो. मात्र आरमोरी तालुक्याच्या

वैरागड : श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा रक्षाबंधन उत्सव देशभर सर्वत्र साजरा केला जातो. मात्र आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे काहार समाजाच्या वतीने मागील १०० वर्षांपासून रक्षाबंधन उत्सव वेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या दुसऱ्या दिवशी वैरागड येथील काहार समाजातील महिला, पुरूष, बालगोपाल एकत्र येतात. गावाच्या मुख्य रस्त्यातून मिरवणूक काढली जाते. मागील १०० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. समाजातील महिला शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या बारीक करून टोपलीत टाकतात. त्या टोपलीमध्ये गव्हाचे दाणे टाकतात व त्यामध्ये गौरी तयार करतात. त्याला ‘भूजली’ असे संबोधले जाते. उत्सवादरम्यान समाजातील महिला, नागरिक नवीन कपडे परिधान करून हातात भूजली घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. हा या समाजाचा मोठा उत्सव मानला जातो. सोबतच लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली रक्षाबंधन उत्सवाला माहेरी आल्यानंतर या उत्सवाचा आनंद डोळ्यात साठवून सासरी जातात. सायंकाळी ४ वाजता गावातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर खोब्रागडी, वैलोचना व नाडवाही या नद्यांच्या त्रीवेणी संगमावर हाताला बांधलेल्या राख्या व महिलांकडे असलेली भूजली यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी या उत्सवाच्या आयोजनासाठी श्रीराम अहीरकर, जयलाल बरवे, भैयालाल पंडेलगोत, होमलाल भरदवार, बालाजी भरदवार आदींसह नागरिकांचा सहकार्य लाभले. (वार्ताहर)