शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम व घोटला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:23 IST

बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अचानक वादळवारा सुटला. या वादळामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली. अनेक झाडे वीज खांबांवर कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. अहेरी तालुक्यातील राजाराम व चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

ठळक मुद्देठिकठिकाणी झाडे कोसळली : वीज पुरवठाही खंडित झाल्याने अनेक गावे अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कराजाराम (खां.)/घोट : बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अचानक वादळवारा सुटला. या वादळामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली. अनेक झाडे वीज खांबांवर कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. अहेरी तालुक्यातील राजाराम व चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.राजाराम परिसरात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक वादळी पाऊस सुरू झाला. या वादळामुळे परिसरातील अनेक विद्युत खांबे कोसळली. त्यामुळे विद्युत तारा लोंबकळत होत्या. वीज खांब कोसळल्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, रायगट्टा, गोलाकर्जी आदी गावातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र उकाड्यातच काढावी लागली.परिसरात अनेक ठिकाणच्या विद्युत लाईनवर झाडे कोसळल्याने दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झाडे काढण्याचे काम सुरू होते. दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. जवळपास दोन दिवस विद्युत पुरवठा सुरू होणार नाही, असे विद्युत कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. पंधवरड्यापूर्वी या भागात अवकाळी पाऊस झाला होता. यावेळीसुद्धा परिसराला वादळाचा जोरदार फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.विकासपल्ली येथे वादळामुळे आंबा व मक्याचे नुकसानचामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला बुधवारी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वादळाचा जोरदार फटका बसला. या भागातील विकासपल्ली येथे वादळाने प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे, कवेलू तसेच छत उडाले. तसेच परिसरातील अनेक विद्युत खांब तुटून पडल्याने वीज तारा अस्ताव्यस्त झाल्या. या भागात अनेक शेतकºयांनी मक्याची लागवड केली होती. परंतु वादळामुळे मका पीक पूर्णत: जमिनीवर सपाट झाले. तसेच वादळामुळे आंबा गळून पडला. काही दिवसातच आंब्यात कोई परिपक्व होणार होती. परंतु याच कालावधीत नुकसान झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विकासपल्ली येथील जवळपास १३ घरांना वादळाचा फटका बसला. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाल्याने जवळपास ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल विभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. त्यानंतर घोटचे मंडळ अधिकारी एस.जी.सरपे, मक्केपल्लीचे तलाठी एस.एम.कुरेशी यांनी विकासपल्ली येथे पंचनामा केला.कवेलू व टिनपत्रे उडालीराजाराम परिसरात अनेक ठिकाणी झाडे व विद्युत खांब कोसळले. येथील आरोग्य उपकेंद्रासमोर मोठ्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. सुदैवाने येथे कुणीच नसल्याने जीवितहानी टळली. याशिवाय गावातील अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले.

टॅग्स :weatherहवामान