शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

जंगल क्षेत्रालगतच्या विहिरींसभाेवताली उंच कठडे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट हाेऊन जंगलातील पाणवठे, वन तलाव व नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करताे; ...

उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट हाेऊन जंगलातील पाणवठे, वन तलाव व नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करताे; परंतु या माध्यमातून आवश्यक प्रमाणात वन्यप्राण्यांची तृष्णा भागविली जात नाही. यामुळे असंख्य वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत शेतातील विहिरी, नदी-नाले, तलाव आदींचा आश्रय घेतात.

वन्यप्राणी जंगलाबाहेर पडल्यानंतर विहिरींमधील पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. यावेळी खोल विहिरीत कोसळून त्यांना इजा होते किंवा गाळात फसून, पाण्यात बुडून मृत्यू होतो. उन्हाळ्यात बरेच शेतकरी कोणत्याही पिकांचे उत्पादन घेत नाहीत. यामुळे शेतात त्यांचे जाणे-येणे राहत नाही. यामुळे विहिरीत प्राणी काेसळून मृत्यू झाला तरी माहीत हाेत नाही.

बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीचे बांधकाम करताना केवळ जमिनीला समांतर बांधकाम केले आहे, तर काही शेतकऱ्यांनी नुसती विहीर खोदून ठेवली; पण बांधकाम केले नाही. यामुळे पाळीव प्राणी, माणसेसुद्धा पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब गंभीर असून, यामुळे शेतकरी आणि वनविभागाने पुढाकार घेऊन विहिरींसभाेवताली संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.

बाॅक्स

संरक्षक कठडे बांधणे सक्तीचे करा

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शासनाकडून सिंचन विहिरींचा लाभ दिला जाताे. या याेजनेतून शेतकरी विहिरींचे बांधकाम करतात; परंतु अनेक जण विहिरीला कठडे बांधत नाहीत. जमिनीच्या पृष्ठभागाला समांतर विहीर बांधली जाते. त्यामुळे अनेक प्राणी पाण्याच्या शाेधात विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. हा धाेका टाळण्यासाठी शासनाने सिंचन विहिरींचे बांधकाम करताना किमान ३ ते ४ फूट उंच संरक्षक कठडे बांधणे अथवा उभारणे शेतकऱ्यांना सक्तीचे करावे, अशी मागणी अजय कुकडकर यांनी केली आहे.