शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

जंगल क्षेत्रालगतच्या विहिरींसभाेवताली उंच कठडे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट हाेऊन जंगलातील पाणवठे, वन तलाव व नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करताे; ...

उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट हाेऊन जंगलातील पाणवठे, वन तलाव व नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करताे; परंतु या माध्यमातून आवश्यक प्रमाणात वन्यप्राण्यांची तृष्णा भागविली जात नाही. यामुळे असंख्य वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत शेतातील विहिरी, नदी-नाले, तलाव आदींचा आश्रय घेतात.

वन्यप्राणी जंगलाबाहेर पडल्यानंतर विहिरींमधील पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. यावेळी खोल विहिरीत कोसळून त्यांना इजा होते किंवा गाळात फसून, पाण्यात बुडून मृत्यू होतो. उन्हाळ्यात बरेच शेतकरी कोणत्याही पिकांचे उत्पादन घेत नाहीत. यामुळे शेतात त्यांचे जाणे-येणे राहत नाही. यामुळे विहिरीत प्राणी काेसळून मृत्यू झाला तरी माहीत हाेत नाही.

बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीचे बांधकाम करताना केवळ जमिनीला समांतर बांधकाम केले आहे, तर काही शेतकऱ्यांनी नुसती विहीर खोदून ठेवली; पण बांधकाम केले नाही. यामुळे पाळीव प्राणी, माणसेसुद्धा पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब गंभीर असून, यामुळे शेतकरी आणि वनविभागाने पुढाकार घेऊन विहिरींसभाेवताली संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.

बाॅक्स

संरक्षक कठडे बांधणे सक्तीचे करा

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शासनाकडून सिंचन विहिरींचा लाभ दिला जाताे. या याेजनेतून शेतकरी विहिरींचे बांधकाम करतात; परंतु अनेक जण विहिरीला कठडे बांधत नाहीत. जमिनीच्या पृष्ठभागाला समांतर विहीर बांधली जाते. त्यामुळे अनेक प्राणी पाण्याच्या शाेधात विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. हा धाेका टाळण्यासाठी शासनाने सिंचन विहिरींचे बांधकाम करताना किमान ३ ते ४ फूट उंच संरक्षक कठडे बांधणे अथवा उभारणे शेतकऱ्यांना सक्तीचे करावे, अशी मागणी अजय कुकडकर यांनी केली आहे.