शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

रेनवॉटर हार्वेस्टिंग कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:20 IST

प्रत्येक शासकीय व खासगी इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असणे शासनाने सक्तीचे केले आहे. कायदा करून पाच पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटला असला तरी गडचिरोली शहरातील एकाही खासगी व्यक्तीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बांधकाम केले नाही.

ठळक मुद्देअंमलबजावणीकडे दुर्लक्ष : गडचिरोलीत एकाही इमारतीला यंत्रणा नाही

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रत्येक शासकीय व खासगी इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असणे शासनाने सक्तीचे केले आहे. कायदा करून पाच पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटला असला तरी गडचिरोली शहरातील एकाही खासगी व्यक्तीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बांधकाम केले नाही. नगर परिषद सुद्धा कारवाई तसेच जनजागृती करीत नसल्याने अनेकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आहे, हे सुद्धा माहित नसल्याचे दिसून येते.पावसाळ्यात पडलेले पाणी वाहून जाते. परिणामी पूरपरिस्थिती निर्माण होते. तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागते. पावसाळ्यात मुबलक पाणी पडत असतानाही भूगर्भातील पाण्याचा वापर घरगुती कामासाठी केला जात नाही. पावसाळ्यातही जमिनीतील पाण्याचा उपसा सुरूच राहते. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवून पावसाचे पाणी एका टँकमध्ये जमा केल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा कमी होईल. उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन रेन वॉटर यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगर परिषदेवर सोपविली आहे. पाच वर्षांच्या कालावधीत अधिकृत व अनाधिकृतरित्या हजारो घरांचे बांधकाम झाले आहे. मात्र एकाकडेही हार्वेस्टिंगची यंत्रणा नाही.असे केले जाते जल पुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. माणसासाठी अपेय असलेले पाणी घरचा गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती कामासाठी वापर करता येते.जनजागृती व कारवाईची गरजउन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेतली तर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा प्रत्येक घरी असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच शासनाने कायदा सुद्धा केला आहे. मात्र हा कायदा नगर परिषद प्रशासनाच्या सहमतीने नागरिक पायदळी तुडवत आहेत. पावसाचे पाणी टँकमध्ये जमा करून त्याचा वापर केल्यास किमान पावसाळ्यात तरी जमिनीतील पाण्याचा उपसा थांबून भूजल पातळी वाढेल. या महत्त्वाच्या यंत्रणेविषयी अनेकांना माहितीच नसल्याचे दिसून येते. वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा अत्यंत कमी खर्चात बसविता येते. वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व पटवून दिल्यास नागरिक ही यंत्रणा बसवतील. मात्र नगर परिषद तसेच इतर विभाग सुद्धा याबाबत जनजागृती करण्यात अपयशी ठरले आहेत. प्रत्येक बांधकामाच्या नियोजनात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा सक्तीची करावी, अशी मागणी आहे.वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा प्रत्येक इमारतीला सक्तीची करणे नगर परिषद प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याबाबतचे नियोजन करून १५ आॅगस्टनंतर अंमलबजावणी केली जाईल. एवढेच नाहीतर वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती सुद्धा केली जाईल. घर बांधकामाला परवानगी देतेवेळी अटी, शर्तींमध्ये वॉटर हार्वेस्टिंगचा उल्लेख करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी