शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

तहानलेल्या पिकांना पावसाने केले तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:29 AM

गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले.

ठळक मुद्देदोन दिवस हजेरी : शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरूवार आणि शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या सर्व भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत टांगणीला लागलेला शेतकºयांचा जीव भांड्यात पडला आहे.जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या धानाला सध्या पावसाची गरज होती. आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरीएवढा पाऊस झाला असला तरी गेल्या १५ ते २० दिवसांत पावसाने हजेरीच न लावल्याने धान पीक सुकण्याच्या मार्गावर होते. पाऊस न आल्यास धान योग्य प्रकारे भरणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली होती. याशिवाय इतर पिकही संकटात आले होते. मात्र शेवटच्या क्षणी वरुणराजाने दया दाखवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात ३२.३ मिमी पाऊस झाला. त्यात चामोर्शी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासात जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.गुरूवारी रात्री बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४० पैकी ४ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात सर्वाधिक चामोर्शी ९३ मिमी, कुनघाडा ७१ मिमी, येनापूर ७३.८ मिमी, आष्टीत ७१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यात वार्षिक पावसाची सरासरी १३५४ मिमी आहे. आतापर्यंत १३०९ मिमी पाऊस झाला असून हे प्रमाण ९६ टक्के आहे. लवकरच वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता आहे.इंजिन व कृषीपंप थांबलेप्रतीक्षा करूनही पाऊस होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी इंजिन व कृषीपंपांच्या सहाय्याने पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र आता इंजिन व कृषीपंप बंद झाले आहेत.

टॅग्स :Rainपाऊस