शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:30 IST

मागील चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता.

ठळक मुद्देढगाळ वातावरण कायम : धान मळणीची कामे थांबली, खरीप पिकांवर विपरित परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारली. आॅक्टोबर महिन्यात धानपिकासाठी पावसाची गरज होती. मात्र पाऊस पडला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांचे धान करपले. काही शेतकऱ्यांनी नदी, नाल्यांना डिझेल इंजिन, मोटार पंप लावून धानपीक वाचविले.धानाची कापणी संपली असून मळणीला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्याच्या काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. बऱ्याच ठिकाणी धान मळणीचे काम ठप्प पडले आहे. शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे झाकून ठेवले आहेत. जोपर्यंत ढगाळ वातावरण जाणार नाही, तोपर्यंत मळणीची कामे बंदच राहणार आहेत.पोपट, तूर, मिरची व इतर भाजीपाला पिकांना फुलबार येत आहे. पहाटेच्या सुमारास प्रचंड प्रमाणात धुके पडत असल्याने पिकांचे फुल झडण्याची समस्या वाढली आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.बुधवारी रात्री आष्टी परिसरात गुरूवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे आष्टी-घोट मार्गावर अडपल्ली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले आहे. वाहनचालकांना रस्त्याच्या बाजूने वाहन काढावे लागत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती.रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. ही पिके आता वाढीला लागली आहेत. अशातच पाऊस झाल्याने या पिकांना मात्र फायदा होण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला आहे.बाजार समिती व आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धानाची आवक वाढली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांचे धान भिजले आहे. ताडपत्री झाकून पावसापासून धानाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत असून काही शेतकºयांचे धान भिजले असल्याचे चित्र दिसून येत आहे.अहेरीत सर्वाधिक पाऊसमागील २४ तासात अहेरी तालुक्यात सर्वाधिक २०.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुलचेरा तालुक्यात २ मिमी, सिरोंचा तालुक्यात १७.६ मिमी, एटापल्ली ५.५ मिमी व भामरागड तालुक्यात ५.५ मिमी पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस