शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:30 IST

मागील चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता.

ठळक मुद्देढगाळ वातावरण कायम : धान मळणीची कामे थांबली, खरीप पिकांवर विपरित परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारली. आॅक्टोबर महिन्यात धानपिकासाठी पावसाची गरज होती. मात्र पाऊस पडला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांचे धान करपले. काही शेतकऱ्यांनी नदी, नाल्यांना डिझेल इंजिन, मोटार पंप लावून धानपीक वाचविले.धानाची कापणी संपली असून मळणीला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्याच्या काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. बऱ्याच ठिकाणी धान मळणीचे काम ठप्प पडले आहे. शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे झाकून ठेवले आहेत. जोपर्यंत ढगाळ वातावरण जाणार नाही, तोपर्यंत मळणीची कामे बंदच राहणार आहेत.पोपट, तूर, मिरची व इतर भाजीपाला पिकांना फुलबार येत आहे. पहाटेच्या सुमारास प्रचंड प्रमाणात धुके पडत असल्याने पिकांचे फुल झडण्याची समस्या वाढली आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.बुधवारी रात्री आष्टी परिसरात गुरूवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे आष्टी-घोट मार्गावर अडपल्ली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले आहे. वाहनचालकांना रस्त्याच्या बाजूने वाहन काढावे लागत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती.रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. ही पिके आता वाढीला लागली आहेत. अशातच पाऊस झाल्याने या पिकांना मात्र फायदा होण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला आहे.बाजार समिती व आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धानाची आवक वाढली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांचे धान भिजले आहे. ताडपत्री झाकून पावसापासून धानाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत असून काही शेतकºयांचे धान भिजले असल्याचे चित्र दिसून येत आहे.अहेरीत सर्वाधिक पाऊसमागील २४ तासात अहेरी तालुक्यात सर्वाधिक २०.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुलचेरा तालुक्यात २ मिमी, सिरोंचा तालुक्यात १७.६ मिमी, एटापल्ली ५.५ मिमी व भामरागड तालुक्यात ५.५ मिमी पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस