शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

गडचिरोलीतील ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक टॉवर कोसळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:33 IST

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष सिरोंचातील ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी

आनंद मांडवे ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडी बांधकाम असलेल्या या ऐतिहासिक वास्तूची निगा राखण्यात शासन व प्रशासनाला आत्मियता नसल्याने त्याची पडझड होत आहे. पुरातत्व विभागामार्फत या वास्तूचे नविनीकरण करून या ऐतिहासिक मूल्यांचे जतन करावे, अशी मागणी होत आहे.हवामान खात्याचे कार्यालय उपराधानी नागपूर येथे असले तरी या खात्याचा कर्मचारी सिरोंचा येथे कार्यरत नाही. इंग्रजांच्या सत्ताकाळात या विभागातील हवामानाचा अंदाज व पर्जन्याचे मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. स्वातंत्र्यानंरही बरीच वर्षे हे कार्य सुरू होते. १९८० पर्यंत स्थानिक महसूल विभागाकडून पर्जन्याची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येत असे. या कामासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात असायचा. मात्र काही दिवसानंतर या ठिकाणी कर्मचारी ठेवणे बंद झाले. नागपूरस्थित हवामान खात्याच्या कार्यालयालाही अशी वास्तू सिरोंचा येथे अद्यापही गतवैभव टिकवून असल्याचे विस्मरण झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष घातल्यास गतवैभव पुन्हा लाभू शकते. यासाठी राज्य शासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

१०७ वर्षांनंतरही विश्रामगृहे सुस्थितीतगडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याला निसर्गसौंदर्याची देणे आहे. त्यामुळे १९१० मध्ये ११ हजार ३६८ रूपये खर्चुन सिरोंचा येथे ब्रिटिश सरकारने विश्रामगृह बांधले. १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्याने सदर इमारती निर्लेखित करण्याविषयी भारत सरकारकडून पत्र येतात. मात्र ब्रिटिशांनी केलेल्या कामाचा दर्जा गुणवत्तापूर्ण व सुसंगत असल्याने या इमारती अजूनही अभेद्य आहेत. सिरोंचा तालुक्यातील बामणी, सोमनपल्ली व कोपेला या आदिवासी व दुर्गम भागातही ब्रिटिशकालीन विश्रामगृहे आहेत. बामनीच्या विश्रामगृहात उपपोलीस स्टेशन थाटले आहे. सोमनपल्लीच्या विश्रामगृहाची दुरावस्था झाली आहे, तर कोपेला येथील विश्रामगृहाची समाजकंटकांनी २३ मार्च २००९ रोजी जाळपोळ केली. या इमारतींचे जतन होण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वास्तूंकडे सरकारचा कानाडोळा होत आहे.तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्षतहसील कार्यालयामागे ध्वजस्तंभाजवळ ही टॉवरवजा वास्तू असून तिच्या लाकडी पायऱ्या जीर्ण झाल्या आहेत. एकमेव सागवानी दाराची मोडतोड झाली आहे. टॉवरच्या शिर्ष भागावर अमलतासचे झाड उगवले आहे. दर दिवसागणिक त्याचा आकार व घेर वाढत आहे. या झाडामुळे टॉवरला धोका निर्माण झाला आहे.सध्या ही वास्तू पूर्व दिशेकडे झुकली आहे. आठवडी बाजार, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व नागरिकांची रहदारी येथूनच राहते. वास्तू कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटने हे पुष्कर यात्रेचा आढावा घेण्यासाठी सिरोंचा येथे आले असता सदर पर्जन्यमापक इमारतीची दुरवस्था लक्षात घेवून दुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतर या इमारकडे प्रशासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :Governmentसरकार