शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९१४ हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:22 IST

गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाचे एकूण २८ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी ९१४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या ९ नोव्हेंबरच्या अहवालात म्हटले आहे.

ठळक मुद्दे२८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र : खते, बि-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाचे एकूण २८ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी ९१४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या ९ नोव्हेंबरच्या अहवालात म्हटले आहे.खरीप बरोबरच गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहू, मका, हरभरा, लाखोळी, उडीद, बरबटी, चवळी, वाल, पोपट, जवस, तीळ, भूईमुग आदी पिकांचा समावेश आहे. काही शेतकºयांकडे रबी हंगामासाठी स्वतंत्र शेती आहे. तर काही शेतकरी धान निघल्यानंतर त्याच बांधीत रबी पिकांची पेरणी करतात. त्यामुळे धान पिकाची कापणी व बांधणी झाल्याशिवाय रबी पिकांच्या पेरणीला वेग येणार नाही. सद्य:स्थितीत ज्या शेतकºयांकडे स्वतंत्र रबीची शेती उपलब्ध आहे. अशाच शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली आहे.गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ४०० हेक्टर एवढे आहे. शासनाने शेतकºयांना अनुदानावर विहिरी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन रबी पिकांची पेरणी करण्याकडे शेतकºयांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे रबी क्षेत्रामध्ये दरवर्षी वाढ होत असल्याचे दिसून येते. चालू वर्षात ३१ हजार ५३१ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार कृषी विभागाने खत, बियाणे, कीटकनाशके यांचे नियोजन केले आहे. मात्र यावर्षी केवळ ७५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे तलाव, बोड्या आटल्या आहेत. भूजल पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी नियोजित क्षेत्राच्या कमी प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूर्वी शेतकरी जवस, तीळ यासारख्या पिकांचे उत्पादन घेत होते. मात्र या पिकांचे उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली असून गहू, मका आदी नगदी पिकांकडे शेतकरी वळला असल्याचे दिसून येते. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र दरवर्षी वाढत चालले आहे. प्रयोगशिल शेतकरी पश्चिम महाराष्टÑात घेतल्या जाणाºया पिकांची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे.३१ हजार हेक्टरचे नियोजनदिवसेंदिवस सिंचनाच्या सुविधा वाढत चालल्या असल्याने रबी पिकाखालील क्षेत्र सुध्दा वाढत चालले आहे. २०१७-१८ च्या खरीप हंगामात ३१ हजार ५३१ हेक्टरवर पेरणी होईल, या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार खते व बि-बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गहू पिकाची लागवड ७५५ हेक्टरवर होणार आहे. ज्वारी ३ हजार ५०० हेक्टर, संकरीत मका २ हजार ६५६, हरभरा ३ हजार ८३०, लाखोळी १३ हजार ९५०, मूग १ हजार ८००, जवस २ हजार ८५०, तीळ १ हजार २८८, सूर्यफूल २८, करडई ६६, भूईमुग ६००, वाटाणा पिकाची २०० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.१४ हजार हेक्टरवर लाखोळी पीकलाखोळीपासून डाळ बनविली जाते. यापूर्वी लाखोळी बाजारपेठेत विकण्यास बंदी घातली होती. मात्र पाच वर्षांपूर्वी शासनाने लाखोळीवरील बंदी हटविली आहे. त्यामुळे अधिकृतपणे लाखोळीची विक्री करता येते. परिणामी चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी लाखोळी पिकाकडे वळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १४ हजार हेक्टरवर लाखोळी पिकाची लागवड केली जाते. लाखोळी पिकासाठी स्वतंत्र जमीन कसण्याची गरज नाही. त्याचबरोबर या पिकाला खतही द्यावे लागत नाही. कमी खर्चात लाखोळीचे पीक होत असल्याने धान उत्पादक शेतकरी या पिकाकडे वळत चालले आहेत. धानपिकाची कापणी करण्यापूर्वी धान पीक उभे असतानाच बियाणे शिंपले जातात.धान कापणीनंतर वेगबहुतांश शेतकरी धान पिकाच्या बांधीतच रबी पिकांची पेरणी करतात. त्यामुळे धानाची कापणी झाल्यानंतर रबी पिकांच्या पेरणीला वेग येणार आहे. विशेष करून जवस, उडीद, मूग, लाखोळी, चना, वाटाणा, गहू आदी पिकांची लागवड धानाच्या बांधीतच केली जाते. धान निघल्यानंतर जमीन मशागतीला सुरूवात होते.सूर्यफूल पिकाकडे ओढारबी हंगामात सूर्यफूल पिकाकडे शेतकºयांचा ओढा वाढत चालला आहे. नदीच्या काठावर ज्या शेतकºयांचे शेत आहेत. असे शेतकरी सूर्यफूल पिकाची लागवड करतात. या पिकाला पाणी द्यावे लागते. काही शेतकरी धानपीक निघल्यानंतर त्याच बांधीमध्ये सूर्यफुलाची लागवड करतात. विशेष करून चामोर्शी तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये सूर्यफूल पिकाचा पेरा वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.