शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रबीचे क्षेत्र यंदा वाढले

By admin | Updated: December 18, 2014 01:02 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सवलतीवर शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याने यंदा रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले ...

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सवलतीवर शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याने यंदा रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले असल्याचे दिसून येते. १० डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत जिल्हाभरात एकूण २७ हजार २२ हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी पिकाची पेरणी ३ हजार ५४१.५५ हेक्टरवर तर गव्हाची पेरणी ४४५.१५ हेक्टरवर करण्यात आली आहे. मक्का १,७२१.७०, हरभरा ३,२६६ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. ९,६२० हेक्टर क्षेत्रावर लाखोळी तर १,५१४ हेक्टर क्षेत्रावर मुंगाची पेरणी करण्यात आली आहे. ७ हेक्टरवर मसूर तर १,०४५ हेक्टरवर पोपट पिकाची पेरणी करण्यात आली आहे. १,३९१ क्षेत्रात उडीद, १३६ हेक्टर क्षेत्रात वटाणा, १५ हेक्टरमध्ये वाल, ४२२ हेक्टर क्षेत्रात बरबटी आणि ६७३ हेक्टर क्षेत्रात कुलधा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात ज्वारी, गहू, मक्का, हरभरा, लाखोळी, मूंग, मसूर, पोपड, उडीद, वटाणा, वाल, बरबटी आदी प्रकारच्या रब्बी पिकांची पेरणी २,१०२ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. चामोर्शी तालुक्यात ७,९९१.२, धानोरा तालुक्यात ३,४५६, मुलचेरा तालुक्यात ४७५.४ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. देसाईगंज तालुक्यात २,५१२.६, आरमोरी तालुक्यात ३,१९४, आरमोरी तालुक्यात २,२८७, कुरखेडा तालुक्यात ६३५, कोरची तालुक्यात ८,६२८.८, अहेरी तालुक्यात १,८१०.४, एटापल्ली तालुक्यात ३०९.७, भामरागड तालुक्यात १९६.१ व सिरोंचा तालुक्यात २,०५१ हेक्टर क्षेत्रात यंदा रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली आहे.इतर कडधान्यांमध्ये मोडणाऱ्या जवस, सूर्यफूल, तीळ व करडई पिकांचीही जिल्ह्यात पेरणी करण्यात आली आहे. १,९९२ हेक्टर क्षेत्रात जवस, १०१ हेक्टर क्षेत्रात सूर्यफूल, २२९ हेक्टर क्षेत्रावर तीळ पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. ५०९ हेक्टर क्षेत्रामध्ये भूईमुंग व २६९ हेक्टर क्षेत्रावर मोहरी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. जिल्हाभरात भूईमुंग व मोहरी आदी गळीत पिकाची पेरणी ३,०९९.२६ हेक्टर क्षेत्रात झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वटाणा लागवडीत देसाईगंज तालुक्याची सरशीगडचिरोली जिल्ह्यात लाखोळी, गहू, ज्वारी, मक्का, हरभरा, उडीद, पोपट आदी रब्बी पिकांची लागवड करण्यात येते. यंदाच्या रब्बी हंगामात देसाईगंज तालुक्यात ७०.७ हेक्टर क्षेत्रामध्ये वटाणा पिकाची लागवड करण्यात आली आहे. आरमोरी तालुक्यात ३६, कुरखेडा तालुक्यात २२, कोरची तालुक्यात ७.४ असे एकूण १३६ हेक्टर क्षेत्रात वटाणा पिकाची पेरणी करण्यात आली आहे. केवळ धानाचे पीक घेणे परवडत नाही, असे लक्षात आल्यावर यंदा प्रथमच चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून १० क्विंटल बियाणे घेऊन वटाणा पिकाची पेरणी केली आहे.२,१३७.६० क्विंटल हरभरा बियाणे वितरितजिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बियाणे सहज उपलब्ध व्हावे, याकरिता सवलतीमध्ये रब्बी पिकांचे बियाणे वितरीत करण्यात आले. जि. प. च्या कृषी विभागामार्फत यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना २ हजार १३७.६० क्विंटल हरभरा बियाणे वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली आहे. २८२.८० क्विंटल गहू तर ३४.२० क्विंटल मका बियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.