शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

ढगाळ वातावरणामुळे रबी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:17 IST

देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात.

ठळक मुद्देअनेक भागात रोगांचाही प्रादुर्भाव : जिल्हाभरातील शेतकरी हवालदिल; कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने ही पिके धोक्यात आली आहे. खरीप हंगामातील अर्धे पीक हातून गेल्यानंतर पुन्हा रबी हंगामात निसर्गाची वक्रदृष्टी पाहून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या धान पिकाची मळणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या भागातील शेतकरी धानपीकासह शेतातल्या बांधावर तूर हे आंतरपीक म्हणून घेतात. आपल्या उत्पादनात चांगली आर्थिक मदत म्हणून शेतकरी तूर व रबी हंगामातील इतर पिकांकडे पाहत असतात. मात्र गेल्या शुक्रवारपासून सूर्याचे दर्शन होत नसून वातावरणात धुकेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणात मंद गारवा पसरला आहे. परिणामी फुलोऱ्यावर येऊन भरत असलेल्या शेंगांवर अळी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम पडणार असल्याची शक्यता शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे.विसोरा गावालगतच्या शेतात धान पिकाच्या कापणीचे काम पूर्ण झाले असल्याने बांधावरील तूर पिकाने शेत परिसर आता हिरवागार दिसत आहे. त्यात तूर पीक फुलावर असून हिरव्या रंगात पिवळसर छटा असल्याचे भासते. परंतु मागील तीन दिवसांपासून दिवसभर सूर्यकिरणे एखाद्याक्षणी बाहेर निघत आहेत. परिणामी ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला धोका निर्माण झाला आहे. फूल फुलून शेंगांमध्ये दाणा भरण्यास सुरूवात झाली असताना, अशावेळी सुर्याची वक्रदृष्टी झाल्याने तूर पिकाच्या शेंगावर काळी व पांढऱ्या रंगाची अळी पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ढगाळ वातावरण असेच कायम राहिल्यास फुलोरा प्रभावित होऊन त्याचा थेट परिणाम तूर पिकावर होण्याची शक्यता आहे.देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात मूग, उडीद, चणा, लाखोळी आदी पिकांची यंदा लागवड करण्यात आली आहे. ही पिके सुध्दा भरण्याच्या मार्गावर आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे या पिकांना सुध्दा धोका निर्माण झाला आहे. आधीच खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांवर दुष्काळाचे संकट कोसळले.आता रबी हंगामातही दुष्काळजन्य परिस्थिती दिसून येत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती