शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

ढगाळ वातावरणामुळे रबी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:17 IST

देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात.

ठळक मुद्देअनेक भागात रोगांचाही प्रादुर्भाव : जिल्हाभरातील शेतकरी हवालदिल; कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने ही पिके धोक्यात आली आहे. खरीप हंगामातील अर्धे पीक हातून गेल्यानंतर पुन्हा रबी हंगामात निसर्गाची वक्रदृष्टी पाहून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या धान पिकाची मळणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या भागातील शेतकरी धानपीकासह शेतातल्या बांधावर तूर हे आंतरपीक म्हणून घेतात. आपल्या उत्पादनात चांगली आर्थिक मदत म्हणून शेतकरी तूर व रबी हंगामातील इतर पिकांकडे पाहत असतात. मात्र गेल्या शुक्रवारपासून सूर्याचे दर्शन होत नसून वातावरणात धुकेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणात मंद गारवा पसरला आहे. परिणामी फुलोऱ्यावर येऊन भरत असलेल्या शेंगांवर अळी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम पडणार असल्याची शक्यता शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे.विसोरा गावालगतच्या शेतात धान पिकाच्या कापणीचे काम पूर्ण झाले असल्याने बांधावरील तूर पिकाने शेत परिसर आता हिरवागार दिसत आहे. त्यात तूर पीक फुलावर असून हिरव्या रंगात पिवळसर छटा असल्याचे भासते. परंतु मागील तीन दिवसांपासून दिवसभर सूर्यकिरणे एखाद्याक्षणी बाहेर निघत आहेत. परिणामी ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला धोका निर्माण झाला आहे. फूल फुलून शेंगांमध्ये दाणा भरण्यास सुरूवात झाली असताना, अशावेळी सुर्याची वक्रदृष्टी झाल्याने तूर पिकाच्या शेंगावर काळी व पांढऱ्या रंगाची अळी पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ढगाळ वातावरण असेच कायम राहिल्यास फुलोरा प्रभावित होऊन त्याचा थेट परिणाम तूर पिकावर होण्याची शक्यता आहे.देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात मूग, उडीद, चणा, लाखोळी आदी पिकांची यंदा लागवड करण्यात आली आहे. ही पिके सुध्दा भरण्याच्या मार्गावर आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे या पिकांना सुध्दा धोका निर्माण झाला आहे. आधीच खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांवर दुष्काळाचे संकट कोसळले.आता रबी हंगामातही दुष्काळजन्य परिस्थिती दिसून येत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती