शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

२८ कोटींच्या धानाची खरेदी

By admin | Updated: May 30, 2014 23:45 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिक अंतर्गत आधारभूत खरेदी हंगाम २0१३-१४ मध्ये अहेरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत २८ कोटी ७९ लाख ७६ हजार ७८२ रूपयांची धान खरेदी करण्यात आली आहे.

अहेरी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिक अंतर्गत आधारभूत खरेदी हंगाम २0१३-१४ मध्ये अहेरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत २८ कोटी ७९ लाख ७६ हजार ७८२ रूपयांची धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र अनेक केंद्रावरील धानाची उचल न करण्यात आल्याने पावसाळ्याच्या दिवसात सदर धान्य सडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पणन हंगामा अंतर्गत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत धान खरेदी करण्यासाठी ३२ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. धान खरेदीसाठी ३१ ऑक्टोबर २0१३ रोजी मंजूरी प्राप्त झाली होती. त्यानुसार अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणार्‍या ६ तालुक्यामधून धान खरेदीस प्रारंभ करण्यात आला. अहेरी तालुक्यात ६, मुलचेरा ३, सिरोंचा तालुक्यात ९, भामरागड तालुक्यात ३, एटापल्ली तालुक्यात १0 व चामोर्शी तालुक्यातील मार्र्कं डा केंद्राचा समावेश होता. अहेरी तालुक्यातील उमानूर येथील केंद्रावरून ६३.८0 क्विंटल अ प्रजातीच्या धानाची खरेदी करण्यात आली. या धान खरेदी अंतर्गत शेतकर्‍यांना ८५ हजार ८११ रूपये प्रदान करण्यात आले. अहेरी तालुक्यात ६ कोटी २३ लाख ३८ हजार ३३४ रूपयांची ४७ हजार ५८४.८१ क्विंटल सर्वसाधारण धानाची खरेदी करण्यात आली. मुलचेरा तालुक्यात २ कोटी ५६ लाख ५0 हजार ९ रूपये किमतीचे १९ हजार ५00 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. सिरोंचा तालुक्यात ८ कोटी ५३ लाख ४२ हजार ५९७ रूपये किमतीचे ६५ हजार ५२८.७0 क्विंटल धान खरेदी झाले. भामरागड तालुक्यात ३ कोटी २२ लाख ६८ हजार ५७५ रूपये किमतीचे २४ हजार ६३२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. सिरोंचा तालुक्यातून ७ कोटी ६0 लाख ६३ हजार २२४ रूपये किमतीचे ५८ हजार ६३ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. चामोर्शी तालुक्यातील मार्कं डा कंसोबा येथील केंद्रावरून ५ कोटी ८१ लाख ४ हजार ४२ रूपये किमतीचे ४ हजार ४३८ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकंदरीत २८ कोटी ७९ लाख रूपयांची धान खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या धानाची त्वरित उचल करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी धान्य उचल करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहनाव्दारे धान्याची उचल केली जात आहे. त्यामुळे यंदा खरेदी करण्यात आलेले धान्य खराब होणार नाही, असे चिन्ह दिसून येत आहे. (प्रतिनिधी)