शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

लॉयडस् मेटल विरोधात पुन्हा जनआक्रोश

By admin | Updated: April 8, 2017 01:43 IST

पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना मालकी हक्क प्रदान केलेल्या जंगलाची लॉयडस् मेटल कंपनीकडून तोड केली जात आहे.

एटापल्ली : पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना मालकी हक्क प्रदान केलेल्या जंगलाची लॉयडस् मेटल कंपनीकडून तोड केली जात आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी नागरिकांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. आदिवासींच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या लॉयडस् मेटल कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी जनहितवादी युवा समिती तसेच वनोेत्पादन मालकी हक्क जनसंघर्ष सभा तालुका एटापल्ली यांच्या वतीने राज्यपाल, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. एटापल्ली तालुक्यातील पांडे, हेडरी, मलमपहाडी, सूरजागड, हेटळकसा, मोहुर्ली या गावातील नागरिकांना पेसा कायद्याअंतर्गत वनोपजाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या वनोपजाच्या भरवशावरच येथील नागरिकांना रोजीरोटी प्राप्त होत आहे. आदिवासींची जीवन पद्धती, संस्कृती, रूढी, परंपरा, सामूहिक हद्द जंगलावर आधारित आहे. पेसा कायद्यानुसार गावाच्या सभोवताल असलेल्या नैसर्गिक संपत्तीचीही मालकी स्थानिक आदिवासींकडे सोपविण्यात आली आहे. यानुसार या परिसरातील खनिजसंपत्तीवर त्यांचाच हक्क आहे. सूरजागड, वाडे, कारमपल्ली पहाडीलगतच्या व सभोवतालच्या ग्रामसभा बांडे, हेडरी, मंगेर, मलमपहाडी, सूरजागड, मेंढेर, हेटळकसा, मोहुर्ली, नागुलवाडी गावांच्या व ग्रामसभांच्या परंपरागत हद्दीत येत असलेल्या कक्ष क्र. १९७, १९८, १९९, २२७, २२८ मधील शेकडो हेक्टर आर क्षेत्रातील साधनसंपत्तीचे अधिकार नागरिकांकडे होते. जंगलातून मिळणारे तेंदू, बांबू, मोह, हिरडा, बेहडा, आवळा, चार, डिंक, मध, मेन, कंदमुळे, औषधी वनस्पतींच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून मजूर यंत्राच्या सहाय्याने येथील झाडांची तोड केली जात आहे. त्यामुळे आदिवासींचा रोजगार हिरावण्याबरोबरच त्यांचे आश्रयस्थानही धोक्यात आले आहे. त्यामुळे लायड्स मेटल कंपनीचे कंत्राटदार, यंत्रचालक, वाहक व अन्य सहकाऱ्यांवर कारवाई करावी, झालेल्या नुकसानीसाठी त्यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून तेवढी रक्कम वसूल करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून ग्रामकोष समितीचे सुरेश बारसागडे, हेडरीचे गावपाटील देवू कवडो, मलमपल्लीचे समन्वयक अशोक सोहन बडा, ग्रामसभा सूरजागडचे अध्यक्ष लालसाय तलांडे, ग्रामसभा हेडरीचे अध्यक्ष रामाजी दोहे पुंगाटी आदींनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एटापल्लीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार करून कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)