शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

जिल्ह्यात धान बांधणीनंतर पंचनामे; खरच मदत मिळणार का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस काेसळत आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामा करणारे पथक धानाची बांधणी झाल्यानंतर शेतात पाेहाेचत आहे. बांधणी झाल्यामुळे शेतात झालेेले नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची माेठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे. पावसामुळे तांदूळ काळा पडत असल्याने या धानाला फारसा भाव मिळत नाही. नुकसानीचा सर्व्हे अगदी वेळेवर हाेणे आवश्यक हाेते. मात्र नुकसानीचा पंचनामा करणारे पथक शेतात उशिरा पाेहाेचत आहे. काही शेतकरी कळपांची बांधणी करून पुंजणे टाकत आहेत. शेतात पथक पाेहाेचल्यानंतर नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे नुकसान न झाल्याचा शेरा लावला  जात  असल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धाेका निर्माण झाला आहे. 

पावसाचा जाेर सुरूचमागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर सुरू आहे. अधून-मधून पाऊस पडत असल्याने धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. पावसामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी व बांधणीची कामे लांबणीवर टाकली आहेत. धान पिकाच्या बांधणीचे काम लांबल्यास तांदळाची क्वालिटी बिघडत असल्याने फारसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. 

धानाला याेग्य भाव मिळणे कठीणपावसाने धान भिजल्यानंतर तांदूळ काळा पडते. या धानाला अतिशय कमी प्रमाणात भाव मिळते. यावर्षी धानाला शासनाने बाेनस अजूनही जाहीर केला नाही. परिणामी बहुतांश धान खासगी व्यापाऱ्यालाच विकावा लागणार आहे. अशातच धानही खराब झाल्याने धानाला अतिशय कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती