शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

जिल्ह्यात धान बांधणीनंतर पंचनामे; खरच मदत मिळणार का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस काेसळत आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामा करणारे पथक धानाची बांधणी झाल्यानंतर शेतात पाेहाेचत आहे. बांधणी झाल्यामुळे शेतात झालेेले नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची माेठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे. पावसामुळे तांदूळ काळा पडत असल्याने या धानाला फारसा भाव मिळत नाही. नुकसानीचा सर्व्हे अगदी वेळेवर हाेणे आवश्यक हाेते. मात्र नुकसानीचा पंचनामा करणारे पथक शेतात उशिरा पाेहाेचत आहे. काही शेतकरी कळपांची बांधणी करून पुंजणे टाकत आहेत. शेतात पथक पाेहाेचल्यानंतर नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे नुकसान न झाल्याचा शेरा लावला  जात  असल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धाेका निर्माण झाला आहे. 

पावसाचा जाेर सुरूचमागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर सुरू आहे. अधून-मधून पाऊस पडत असल्याने धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. पावसामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी व बांधणीची कामे लांबणीवर टाकली आहेत. धान पिकाच्या बांधणीचे काम लांबल्यास तांदळाची क्वालिटी बिघडत असल्याने फारसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. 

धानाला याेग्य भाव मिळणे कठीणपावसाने धान भिजल्यानंतर तांदूळ काळा पडते. या धानाला अतिशय कमी प्रमाणात भाव मिळते. यावर्षी धानाला शासनाने बाेनस अजूनही जाहीर केला नाही. परिणामी बहुतांश धान खासगी व्यापाऱ्यालाच विकावा लागणार आहे. अशातच धानही खराब झाल्याने धानाला अतिशय कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती