शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

जिल्ह्यात धान बांधणीनंतर पंचनामे; खरच मदत मिळणार का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस काेसळत आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामा करणारे पथक धानाची बांधणी झाल्यानंतर शेतात पाेहाेचत आहे. बांधणी झाल्यामुळे शेतात झालेेले नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची माेठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे. पावसामुळे तांदूळ काळा पडत असल्याने या धानाला फारसा भाव मिळत नाही. नुकसानीचा सर्व्हे अगदी वेळेवर हाेणे आवश्यक हाेते. मात्र नुकसानीचा पंचनामा करणारे पथक शेतात उशिरा पाेहाेचत आहे. काही शेतकरी कळपांची बांधणी करून पुंजणे टाकत आहेत. शेतात पथक पाेहाेचल्यानंतर नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे नुकसान न झाल्याचा शेरा लावला  जात  असल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धाेका निर्माण झाला आहे. 

पावसाचा जाेर सुरूचमागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर सुरू आहे. अधून-मधून पाऊस पडत असल्याने धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. पावसामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी व बांधणीची कामे लांबणीवर टाकली आहेत. धान पिकाच्या बांधणीचे काम लांबल्यास तांदळाची क्वालिटी बिघडत असल्याने फारसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. 

धानाला याेग्य भाव मिळणे कठीणपावसाने धान भिजल्यानंतर तांदूळ काळा पडते. या धानाला अतिशय कमी प्रमाणात भाव मिळते. यावर्षी धानाला शासनाने बाेनस अजूनही जाहीर केला नाही. परिणामी बहुतांश धान खासगी व्यापाऱ्यालाच विकावा लागणार आहे. अशातच धानही खराब झाल्याने धानाला अतिशय कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती