शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

साडेसात कोटींची तरतूद

By admin | Updated: July 6, 2014 23:57 IST

उन्हाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीने नुकत्याच ३ जुलै रोजी पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत

सागर पाटील : टेंभ्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील माध्यमिक शाळांची सन २०१३-१४ची संचमान्यता करण्यात आली आहे. यामुळे माध्यमिक शाळांमधील अनेक डी. एड. शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करणाऱ्या डी. एड. शिक्षकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यातील तरतुदींनुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करण्यासाठी पदवीधर शिक्षक आवश्यक आहेत. २०१३-१४ च्या माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेमध्ये या तरतुदीची अमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे पूर्वीचे पाचवी ते सातवीपर्यंत प्रत्येक वर्गासाठी एक डी. एड. शिक्षक हे सूत्र निरुपयोगी ठरत आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार केवळ इयत्ता पाचवीच्या वर्गाला अध्यापन करण्यासाठी डी. एड. पात्रताधारक शिक्षक ग्राह्य धरण्यात येणार आहे.२०१३-१४ च्या संचमान्यतेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी असे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळांमध्ये पाचवीच्या वर्गसंख्येइतके डी. एड. शिक्षक मंजूर करण्यात आले आहेत. पूर्वीच्या सुत्राप्रमाणे सहावी व सातवीच्या वर्गांना अध्यापन करणारे डी. एड. शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले आहेत. डी. एड. पात्रताधारक शिक्षकांऐवजी पदवीधर शिक्षकांच्या अधिक पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे माध्यमिक शाळांमधील मान्य पदवीधर शिक्षकांच्या संख्येत भर पडली आहे.अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या डी. एड. शिक्षकांमधील पदवीधर असणाऱ्या शिक्षकांना इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गाना अध्यापन करण्यासाठी परवानगी मिळणार आहे. परंतु पदवीधर नसणाऱ्या डी. एड. शिक्षकांना अतिरिक्त समजले जाणार आहे.माध्यमिक शाळेमध्ये अध्यापन करणाऱ्या डी. एड. शिक्षकांवर ‘अतिरिक्त’ची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. कायम शिक्षकांना सेवा शाश्वती असल्याने शासन स्तरावरुन त्यांचे समायोजन केले जाणार आहे. कायम नसणाऱ्या शिक्षकांना मात्र विपरीत परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठीच समितीचा अहवाल व त्यानंतरची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे डीएड शिक्षकांचा प्रश्न कायम आहे.