शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात कोटींची तरतूद

By admin | Updated: July 6, 2014 23:57 IST

उन्हाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीने नुकत्याच ३ जुलै रोजी पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत

सागर पाटील : टेंभ्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील माध्यमिक शाळांची सन २०१३-१४ची संचमान्यता करण्यात आली आहे. यामुळे माध्यमिक शाळांमधील अनेक डी. एड. शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करणाऱ्या डी. एड. शिक्षकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यातील तरतुदींनुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करण्यासाठी पदवीधर शिक्षक आवश्यक आहेत. २०१३-१४ च्या माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेमध्ये या तरतुदीची अमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे पूर्वीचे पाचवी ते सातवीपर्यंत प्रत्येक वर्गासाठी एक डी. एड. शिक्षक हे सूत्र निरुपयोगी ठरत आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार केवळ इयत्ता पाचवीच्या वर्गाला अध्यापन करण्यासाठी डी. एड. पात्रताधारक शिक्षक ग्राह्य धरण्यात येणार आहे.२०१३-१४ च्या संचमान्यतेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी असे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळांमध्ये पाचवीच्या वर्गसंख्येइतके डी. एड. शिक्षक मंजूर करण्यात आले आहेत. पूर्वीच्या सुत्राप्रमाणे सहावी व सातवीच्या वर्गांना अध्यापन करणारे डी. एड. शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले आहेत. डी. एड. पात्रताधारक शिक्षकांऐवजी पदवीधर शिक्षकांच्या अधिक पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे माध्यमिक शाळांमधील मान्य पदवीधर शिक्षकांच्या संख्येत भर पडली आहे.अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या डी. एड. शिक्षकांमधील पदवीधर असणाऱ्या शिक्षकांना इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गाना अध्यापन करण्यासाठी परवानगी मिळणार आहे. परंतु पदवीधर नसणाऱ्या डी. एड. शिक्षकांना अतिरिक्त समजले जाणार आहे.माध्यमिक शाळेमध्ये अध्यापन करणाऱ्या डी. एड. शिक्षकांवर ‘अतिरिक्त’ची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. कायम शिक्षकांना सेवा शाश्वती असल्याने शासन स्तरावरुन त्यांचे समायोजन केले जाणार आहे. कायम नसणाऱ्या शिक्षकांना मात्र विपरीत परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठीच समितीचा अहवाल व त्यानंतरची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे डीएड शिक्षकांचा प्रश्न कायम आहे.