शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

एपीएल कार्डधारकांना धान्य द्या

By admin | Updated: May 11, 2014 00:19 IST

केंद्र सरकारने गरिबांना स्वस्त धान्य देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना अंमलात आणली. मात्र या अन्नसुरक्षा योजनेमुळे प्रत्येक बिपीएल कार्डधारकांना मिळणारे ....

आरमोरी : केंद्र सरकारने गरिबांना स्वस्त धान्य देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना अंमलात आणली. मात्र या अन्नसुरक्षा योजनेमुळे प्रत्येक बिपीएल कार्डधारकांना मिळणारे धान्य पूर्वीपेक्षा कमी झाले. त्यामुळे सदर योजनेची अंमलबजावणी करून शासनाने गरिबांची थट्टा केली आहे. आरमोरी तालुक्यात मागील ३ महिन्यापासून एपीएल (केशरी) कार्डधारकांना गहू, तांदळाचा पुरवठा करणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आरमोरी येथील एपीएल धारकांवर अन्याय होत आहे. एपीएलधारकांना गहू, तांदळाचा पुरवठा पूर्वीप्रमाणे करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव डॉ. महेश कोपूलवार यांनी दिला आहे. शासनाने अन्नसुरक्षेचा कायदा अंमलात आणला. मात्र यात काही निवडक एपीएलकार्डधारकांना समाविष्ट करण्यात आले. तर काही कार्डधारक सधन असल्याचे कारण दाखवून एपीएलकार्डधारकांना एपीएलच ठेवण्यात आले. मात्र या एपीएल कार्डधारकांमध्ये अनेक कुटुंब सामान्य असून हलाखीचे जीवन जगत आहेत. आरमोरी तालुक्यातील अनेक एपीएलकार्डधारकांंना केला जाणारा गहू व तांदळाचा पुरवठा मागील ३ महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील एपीएल कार्डधारकांवर अन्याय झाला आहे. परिणामी अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. ज्या कुटुंबांकडे एपीएलचे कार्ड आहे, असे कुटुंब अजुनही हलाखीचे जीवन जगत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप कोपुलवार यांनी केला आहे. एपीएल व बीपीएल असा भेदभाव न ठेवता सरसकट सर्वांना २ रूपये गहू व ३ रूपये किलो तांदूळ असा पुरवठा करावा, प्रत्येक महिन्याला प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धान्य द्यावे, शासन प्रती व्यक्ती ४ किलो धान्य देत असल्याने एवढ्याच्या धान्यात कुटुंबाचे भरणपोषण करणे कठीण होत चालले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात जितडेतिकडे कमी धान्य मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. बीपीएल कार्डधारकांना मिळणारे कमी धान्य व एपीएल कार्डधारकांना ३ महिन्यापासून धान्य न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदारही दुकानात येणार्‍या कमी धान्याच्या पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. एपीएल कार्डधारकांना ३ महिन्यापासून बंद करण्यात आलेला धान्य पुरवठ्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन एपीएल कार्डधारकांना मिळणारे धान्य पूर्ववत करावे, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाकपचे जिल्हासचिव डॉ. महेश कोपूलवार, जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, विनोद झोडगे, देवराव चवळे यांनी दिला आहे.