शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

निसर्गाचे रक्षण ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST

गडचिरोली : पृथ्वी, वायू, जल, आकाश व अग्नी हे निसर्गाचे अविभाज्य घटक असून ही पंचमहाभूते म्हणून ओळखले जातात. त्या ...

गडचिरोली : पृथ्वी, वायू, जल, आकाश व अग्नी हे निसर्गाचे अविभाज्य घटक असून ही पंचमहाभूते म्हणून ओळखले जातात. त्या दृष्टीने निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज असून शहरातील नागरिकांनी रक्षण करावे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष याेगिता पिपरे यांनी केले.

नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

राज्य शासनाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील प्रदूषण कमी हाेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा व पर्यावरणाचेे संतुलन राहावे, असा संदेश देण्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात आली. नगर परिषद कार्यालयातून रॅलीस प्रारंभ होऊन इंदिरा गांधी चौकापर्यंत पर्यावरण व प्रदूषण मुक्त गडचिरोली, अशी घोषणा देत जनजागृती करण्यात आली.

यावेळी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, प्रभारी मुख्याधिकारी माधुरी सलामे, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, अग्निशमन पर्यवेक्षक अनिल गोवर्धन, कार्यालयीन अधीक्षक मधुकर कन्नाके, आरोग्य विभागाचे राजेश मधुमटके, तृप्ती व इतर कर्मचारी उपस्थित होते.