शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागातील ४९ पुलांचे प्रस्ताव

By admin | Updated: October 30, 2016 01:00 IST

आरआरपी (रोड रिक्वायर प्लान) टप्पा २ अंतर्गत ४९ पुलांचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करून...

दुसरा टप्पा सुरू : केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर; वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणारगडचिरोली : आरआरपी (रोड रिक्वायर प्लान) टप्पा २ अंतर्गत ४९ पुलांचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडे पाठविला आहे. केंद्र शासन लेफ्टविंग कार्यक्रमाअंतर्गत या पुलांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जंगलव्याप्त भागातील गावांचा विकास स्वातंत्र्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही. या गावांमध्ये अजूनही सोयीसुविधांचा अभाव आहे. या बाबीचा बाहू करून नक्षल्यांनी या भागात नक्षल चळवळ उभी केली. या भागाचा विकास करूनच नक्षल्यांना तोंड देता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त भागातील गावांना सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात केंद्र शासनाने मोबाईल टॉवर, पूल, रस्ते व इतर विकास कामे करण्यासाठी निधी बांधून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्ते व पूल बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये ४९ पुलांचा समावेश आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील पर्लकोटा नदीवरील पूल, व्यंकटापूर-करनेली-लंकाचेन रस्त्यावरील पूल भाडभिडी-घोट-रेगडी-कोटमी-कसनसूर मार्गावरील कोंदावाही नाल्यावरील पूल, जिमलगट्टा-किष्टापूर ते राज्य सीमा मार्गावरील मोठा पूल, कोठी-गट्टा-जिजावंडी-कुकेली मार्गावरील दोन मोठ्या पुलांचे बांधकाम, कसनसूर ते भेंडीकरणार मार्गावरील पाच मोठ्या पुलांचे बांधकाम करणे, कसनसूर-गडदापल्ली-रेकनार-भेंडीकनार रस्त्यावरील पाच पुलांचे बांधकाम करणे, धोडराज कवंडे ते राज्य सीमा रस्त्यापर्यंत चार लहान पुलांचे बांधकाम, बांडिया नदीवरील मोठा पूल, एटापल्ली-गट्टा-सूरजागड मार्गावर दोन मोठे पूल, आलापल्ली-भामरागड रस्त्यावर पेरमिली नदीवरील पुलाचे बांधकाम करणे, रेगडी-देवाडा-एटापल्ली रस्त्यावरील दिना नदीवर पूल बांधणे यांचा समावेश आहे. प्रमुख जिल्हा मार्गांच्या दुरूस्तीमध्ये जारावंडी ते राज्य सीमा रस्त्यावरील बांडिया नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, येडसगोंदी-अलोंगा-परसलगोंदी रस्त्यावर दोन पूल बांधणे, येडजल-बेतकाठी रस्त्यावर दोन मोठे व १३ लहान पुलांचे बांधकाम करणे, झिंगानूर-वडडेली-येडसील-कल्लेड-कोजोड-देचली रस्त्यावरील दोन पुलांचे बांधकाम करणे, नारगुुंडा-येडसलगोंदीदरम्यान तीन पुलांचे बांधकाम, रोमपल्ली-कोपेला मार्गावरील दोन पुलांचे बांधकाम, गट्टा रस्त्यावरील एका पुलाचे बांधकाम करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. डावीकडवी विचारसणीग्रस्त अंतर्गत गृहमंत्रालयाने गोदावरील तसेच इंद्रावती नदीवरीवर पूल मंजूर केले. गोदावरील नदीवरील पूलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा पूल तेलंगणाला जोडतो. तर इंद्रावती नदीवरील पूल छत्तीसगड राज्याला जोडतो. पूल बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्यास वाहतुकीला गती मिळण्यास मदत होणार आहे. या पुलांच्या बांधकामाला निधी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींचा राजकीय दबाव असणे अत्यंत आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)२०० पेक्षा अधिक टॉवरची उभारणीनक्षलग्रस्त भागामध्ये मोबाईलचे नेटवर्क तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नक्षलग्रस्त भागात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक टॉवर बीएसएनएल विभागाने उभे केले आहेत. काहींचे बांधकाम पूर्ण झाले असून ते सुरू सुद्धा झाले आहेत. तर काहींचे बांधकाम अजूनही सुरू आहे. मोबाईलचे जाळे निर्माण झाल्याने विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.