शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'अन्न व औषधी'मध्ये ४०० जागांच्या पदभरतीचा प्रस्ताव; मंत्री संजय राठोड यांची गडचिरोलीत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 10:44 IST

शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ते येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

गडचिरोली : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा राज्यभरातील कारभार सध्या जेमतेम ५०० लोकांवर सुरू आहे. या विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कामावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ४०० जागांच्या भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती राज्याचे नवनिर्वाचित अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी गडचिरोलीत बोलताना दिली.

शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ते येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आमचे सरकार काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल हे सुचविण्यासाठी कृषी क्षेत्राशी निगडित अभ्यास गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांनी मनोबल खचून आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

महंत सुनील महाराजांचा ‘तो’ वैयक्तिक निर्णय

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ते म्हणजे समाज नाही. बंजारा समाजाचे लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागGadchiroliगडचिरोली