शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

मेडिगट्टा प्रकल्प बुडविणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 21:02 IST

तेलंगणातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्प बुडविणारा असून महाराष्ट्राला धोका व नुकसानदायक आहे.

ऑनलाइन लोकमत 

अहेरी, दि. 17 -  तेलंगणातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्प बुडविणारा असून महाराष्ट्राला धोका व नुकसानदायक आहे असा स्पष्ट व घणाघाती आरोप सिरोंचा तालुक्यातील वडदम पोचमपल्ली व परिसरातील असंख्य गावकरी आणि शेतकऱ्यांनी आज अहेरी येथील शासकीय विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 
पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी म्हटले की, तेलंगणा सरकार अशिक्षित व अडाणीपणाचा फायदा घेत असून जमिनीचा मोबदल्यात कवडीमोल भाव देऊन फसवेगिरीचा डाव आखून तेलंगणा सरकार आपला हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे हे आमच्यासाठी धोकादायक व कुटुंबियांसाठी जीवना मरण्याचा प्रश्न असून जमिनीच्या मोबदल्यात मार्केट रेट प्रमाणे भाव, जमिनीची पर्यायी व्यवस्था व प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियातून प्रत्येक सदस्याला नोकरी दिली तरच जमीन देऊ अन्यथा जमीन देणार नाही व याविरोधात मोठे जनआंदोलन उभारणार असा गर्भगळीत ईशाराही वडदम, पोचमपल्ली व परिसरातील गावकऱ्यांनी व कास्तकारांनी पत्रकार परिषदेत दिला.
     
गावकरी व शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत पुढे म्हटले की, आमची जमीन वडिलोपार्जित व चार-पाच पिढ्यांपासून वास्तव्यास असून शेत जमीन कसत आहोत परंतु तेलंगणा सरकारचा मेटिगट्टा बॅरेजमुळे आमचे कुटुंबीय उघड्यावर येणार असून आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे अशी भीतीही पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी व्यक्त करून या मोबदल्यात जमिनीतील  बाजारभावाच्या योग्य व उच्चीत किंमतीनुसार व शेतात बोरवेल्स असेल तर ती किंमत बेरीज करून तसा मोबदला, वास्तव्यास व पुनर्वसनासाठी  जमीन, शेतीकरिता सुपीक शेतजमीन, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय नौकरी, आणि नव्याने जीवन स्थापित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंब प्रमुखाला पेन्शन लागू करण्यात यावे अशी एकमुखी व तीव्र मागणी तेलंगणा व महाराष्ट्र शासनाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत करून आपली कैफियत व व्यथा  मांडले. व त्या नंतर तसे निवेदनही अहेरीच्या उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे सोपविले. 
 
पत्रकार परिषदेत सरपंच चंद्रय्या किष्टय्या सिंहानेनी, राजन्ना लसमय्या सल्ला, संजीव राजन्ना गोरे, रवींद्र येरय्या सल्ला, पुरेल्ली लिंगय्या, चल्ला शकरय्या बंगारू, आकुला व्येंकन्ना, गोरे व्येंकटेश राजाराम, सल्ला महेश येरय्या, सल्ला रमेश पोचम, गोरे तिरुपती लिंगय्या, गोरे श्रीनिवास राजाराम, अनुमुला शंकर लिंगय्या, पट्टेम समय्या मलय्या, दासरी राजन्ना चंद्रय्या आदी व असंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते.