शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगट्टा प्रकल्प बुडविणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 21:02 IST

तेलंगणातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्प बुडविणारा असून महाराष्ट्राला धोका व नुकसानदायक आहे.

ऑनलाइन लोकमत 

अहेरी, दि. 17 -  तेलंगणातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्प बुडविणारा असून महाराष्ट्राला धोका व नुकसानदायक आहे असा स्पष्ट व घणाघाती आरोप सिरोंचा तालुक्यातील वडदम पोचमपल्ली व परिसरातील असंख्य गावकरी आणि शेतकऱ्यांनी आज अहेरी येथील शासकीय विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 
पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी म्हटले की, तेलंगणा सरकार अशिक्षित व अडाणीपणाचा फायदा घेत असून जमिनीचा मोबदल्यात कवडीमोल भाव देऊन फसवेगिरीचा डाव आखून तेलंगणा सरकार आपला हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे हे आमच्यासाठी धोकादायक व कुटुंबियांसाठी जीवना मरण्याचा प्रश्न असून जमिनीच्या मोबदल्यात मार्केट रेट प्रमाणे भाव, जमिनीची पर्यायी व्यवस्था व प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियातून प्रत्येक सदस्याला नोकरी दिली तरच जमीन देऊ अन्यथा जमीन देणार नाही व याविरोधात मोठे जनआंदोलन उभारणार असा गर्भगळीत ईशाराही वडदम, पोचमपल्ली व परिसरातील गावकऱ्यांनी व कास्तकारांनी पत्रकार परिषदेत दिला.
     
गावकरी व शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत पुढे म्हटले की, आमची जमीन वडिलोपार्जित व चार-पाच पिढ्यांपासून वास्तव्यास असून शेत जमीन कसत आहोत परंतु तेलंगणा सरकारचा मेटिगट्टा बॅरेजमुळे आमचे कुटुंबीय उघड्यावर येणार असून आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे अशी भीतीही पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी व्यक्त करून या मोबदल्यात जमिनीतील  बाजारभावाच्या योग्य व उच्चीत किंमतीनुसार व शेतात बोरवेल्स असेल तर ती किंमत बेरीज करून तसा मोबदला, वास्तव्यास व पुनर्वसनासाठी  जमीन, शेतीकरिता सुपीक शेतजमीन, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय नौकरी, आणि नव्याने जीवन स्थापित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंब प्रमुखाला पेन्शन लागू करण्यात यावे अशी एकमुखी व तीव्र मागणी तेलंगणा व महाराष्ट्र शासनाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत करून आपली कैफियत व व्यथा  मांडले. व त्या नंतर तसे निवेदनही अहेरीच्या उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे सोपविले. 
 
पत्रकार परिषदेत सरपंच चंद्रय्या किष्टय्या सिंहानेनी, राजन्ना लसमय्या सल्ला, संजीव राजन्ना गोरे, रवींद्र येरय्या सल्ला, पुरेल्ली लिंगय्या, चल्ला शकरय्या बंगारू, आकुला व्येंकन्ना, गोरे व्येंकटेश राजाराम, सल्ला महेश येरय्या, सल्ला रमेश पोचम, गोरे तिरुपती लिंगय्या, गोरे श्रीनिवास राजाराम, अनुमुला शंकर लिंगय्या, पट्टेम समय्या मलय्या, दासरी राजन्ना चंद्रय्या आदी व असंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते.