शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

प्रकल्प समित्या कागदावर

By admin | Updated: May 11, 2014 00:18 IST

आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व दुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प

देसाईगंज : आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व दुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील विविध योजना अनेक कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्तरीय आढावा समित्या स्थापन करण्यात आल्या. परंतु या समित्या वेळोवेळी आढावा घेतांना दिसून येत नाही. त्यामुळे या समित्या केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात येत असल्याने आदिवासींच्या विकासाची गती खुंटलेली असल्याचे चित्र आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील आदिवासी जिल्ह्यासाठी एकूण २४ समित्या नेमण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात समिती गठीत करण्यात आली. या प्रकल्प समितीवर अध्यक्ष तसेच अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली. परंतु निवड करण्यात आलेल्या सदस्यांचे निकष व नियम न ठरविल्याने समितीच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. समितीच्या अकार्यक्षमतेमुळे विकास कुणाचा होणार हा प्रश्न निर्माण झाला. आदिवासी विकास प्रकल्प समितीवर निवड करीत असतांना शासन कोणत्याही प्रकाराचे स्वार्थ मनात न बाळगता आदिवासींच्या समस्यांची जाण असणारे व परिसरातील समस्यांचे जाण असणारे सामाजिक कार्यकर्ते जे नि:स्वार्थपणे कार्य करण्यास इच्छुक आहेत अशा लोकांची आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्‍यांकडून माहिती मागवून व शिफारस करूनच निवड करावयाची असते. परंतु तसे न होता आपल्या परिचयातील किंवा मर्जीतील व्यक्तींची समितीवर निवड करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्यांचे आदिवासींसाठी कोणतेही योगदान नाही किंवा ज्यांना कायद्याचे ज्ञान नाही किंवा आदिवासींबरोबर संबंध नाहीत अशांची समितीवर निवड करण्यात आल्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयीन कर्मचार्‍यांकडून समिती सदस्यांना चांगल्या प्रकारचे ज्ञान देऊन समजाविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपल्या अट्टहासामुळे अशा सदस्यांकडून अनेकदा कर्मचार्‍यांना अपमानित केल्या जाते. एखाद्या कर्मचार्‍यांनी अथवा अधिकार्‍यांनी त्यांच्या मताप्रमाणे काम न केल्यास त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो. ऐवढेच नव्हे तर आदिवासी जनतेच्या हितासंबंधी समितीच्यावतीने नागरिकांना कोणतेही लाभ दिले जात नाही. (शहर प्रतिनिधी)