शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

प्रकल्प समित्या कागदावर

By admin | Updated: May 11, 2014 00:18 IST

आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व दुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प

देसाईगंज : आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व दुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील विविध योजना अनेक कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्तरीय आढावा समित्या स्थापन करण्यात आल्या. परंतु या समित्या वेळोवेळी आढावा घेतांना दिसून येत नाही. त्यामुळे या समित्या केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात येत असल्याने आदिवासींच्या विकासाची गती खुंटलेली असल्याचे चित्र आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील आदिवासी जिल्ह्यासाठी एकूण २४ समित्या नेमण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात समिती गठीत करण्यात आली. या प्रकल्प समितीवर अध्यक्ष तसेच अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली. परंतु निवड करण्यात आलेल्या सदस्यांचे निकष व नियम न ठरविल्याने समितीच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. समितीच्या अकार्यक्षमतेमुळे विकास कुणाचा होणार हा प्रश्न निर्माण झाला. आदिवासी विकास प्रकल्प समितीवर निवड करीत असतांना शासन कोणत्याही प्रकाराचे स्वार्थ मनात न बाळगता आदिवासींच्या समस्यांची जाण असणारे व परिसरातील समस्यांचे जाण असणारे सामाजिक कार्यकर्ते जे नि:स्वार्थपणे कार्य करण्यास इच्छुक आहेत अशा लोकांची आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्‍यांकडून माहिती मागवून व शिफारस करूनच निवड करावयाची असते. परंतु तसे न होता आपल्या परिचयातील किंवा मर्जीतील व्यक्तींची समितीवर निवड करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्यांचे आदिवासींसाठी कोणतेही योगदान नाही किंवा ज्यांना कायद्याचे ज्ञान नाही किंवा आदिवासींबरोबर संबंध नाहीत अशांची समितीवर निवड करण्यात आल्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयीन कर्मचार्‍यांकडून समिती सदस्यांना चांगल्या प्रकारचे ज्ञान देऊन समजाविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपल्या अट्टहासामुळे अशा सदस्यांकडून अनेकदा कर्मचार्‍यांना अपमानित केल्या जाते. एखाद्या कर्मचार्‍यांनी अथवा अधिकार्‍यांनी त्यांच्या मताप्रमाणे काम न केल्यास त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो. ऐवढेच नव्हे तर आदिवासी जनतेच्या हितासंबंधी समितीच्यावतीने नागरिकांना कोणतेही लाभ दिले जात नाही. (शहर प्रतिनिधी)