शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन हे पाणी शेतात पूर्णपणे पसरले आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : एक हजारपेक्षा अधिक एकरातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारच्या वतीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर उभारलेल्या मेडीगट्टा प्रकल्पाच्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्याच्या एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारकडे आपण ही सर्व वस्तूस्थिती मांडून प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.खासदार नेते यांनी मंगळवारी (दि.२५) मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी दामोधर अरगेला, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, मधुसुदन अरवेली आदी उपस्थित होते.मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन हे पाणी शेतात पूर्णपणे पसरले आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न जिल्हाधिकारी व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात मांडणार आहे. तसेच बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही खासदार नेते यांनी दिली.पंतप्रधानांकडे तक्रार करणारमेडीगड्डा सिंचन प्रकल्पाबाबत तेलंगणा सरकारने तत्कालीन महाराष्ट्र सरकारसोबत करार केला. मात्र करारानुसार तेलंगणा सरकारने प्रकल्पाचे काम केले नाही. करारादरम्यान ठरविण्यात आलेल्या बाबींची पूर्तता तेलंगणा सरकारने केली नाही. त्यामुळे तेलंगणा सरकारकडून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाली आहे, असा आरोप खा. नेते यांनी केला. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, असेही त्यांनी बाधीत शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

टॅग्स :FarmerशेतकरीAshok Neteअशोक नेते