शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन हे पाणी शेतात पूर्णपणे पसरले आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : एक हजारपेक्षा अधिक एकरातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारच्या वतीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर उभारलेल्या मेडीगट्टा प्रकल्पाच्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्याच्या एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारकडे आपण ही सर्व वस्तूस्थिती मांडून प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.खासदार नेते यांनी मंगळवारी (दि.२५) मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी दामोधर अरगेला, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, मधुसुदन अरवेली आदी उपस्थित होते.मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन हे पाणी शेतात पूर्णपणे पसरले आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न जिल्हाधिकारी व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात मांडणार आहे. तसेच बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही खासदार नेते यांनी दिली.पंतप्रधानांकडे तक्रार करणारमेडीगड्डा सिंचन प्रकल्पाबाबत तेलंगणा सरकारने तत्कालीन महाराष्ट्र सरकारसोबत करार केला. मात्र करारानुसार तेलंगणा सरकारने प्रकल्पाचे काम केले नाही. करारादरम्यान ठरविण्यात आलेल्या बाबींची पूर्तता तेलंगणा सरकारने केली नाही. त्यामुळे तेलंगणा सरकारकडून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाली आहे, असा आरोप खा. नेते यांनी केला. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, असेही त्यांनी बाधीत शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

टॅग्स :FarmerशेतकरीAshok Neteअशोक नेते