शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

दुर्गम भागातील कार्यक्रम होतात अजूनही प्लास्टिकमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : स्वत:ला उच्चशिक्षीत मानणारे शहरातील नागरिक कार्यक्रमांमध्ये प्रतिबंधीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र ग्रामीण भागात अजुनही कार्यक्रमांसाठी झाडाच्या पानांपासून पत्रावळी, द्रोण तयार केले जातात. त्यामुळे येथील कार्यक्रम प्लास्टिकमुक्त होतात. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक सांगून फिरत नसले तरी ते अप्रत्यक्षपणे पर्यावरणप्रेमी असल्याचे दिसून येते.प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. जाळल्यास अत्यंत विषारी वायू तयार होतात. हे सर्व प्लास्टिक वापराचे तोटे आहेत. शहरी भागातील नागरिक, कर्मचारी, व्यापारी वर्गाला प्लास्टिकच्या वापराचे कोणते दुष्परिणाम आहेत, हे माहित आहेत. याबाबत अनेकदा भाषणेही झोडली जातात. मात्र शहरातील अपवाद वगळता प्रत्येक कार्यक्रमात प्रतिबंधीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केला जातो. बोलायचे वेगळे व करायची कृती वेगळी, अशी स्थिती शहरातील नागरिकांची असल्याचे दिसून येते. दुर्गम भागातील नागरिक मात्र बोलत नसले तरी ते करून दाखवितात. दुर्गम भागातही अनेक समारंभ होतात. या समारंभादरम्यान शेकडो नागरिकांचे सामुहिक जेवन राहते. या सामुहिक जेवनासाठी पळस, मोह व इतर झाडांच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण तयार करतात. या सर्व वस्तू निसर्गातून मिळतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त खर्च होत नाही. तसेच या सर्व वस्तू पर्यावरणपुरक आहेत. विशेष म्हणजे, जंगलातून पाने आणण्यापासून ते द्रोण व पत्रावळी तयार करण्यासाठी गावातील महिला, पुरूष मदत करतात. या मदतीच्या माध्यमातून गावातील एकोपा टिकण्यास मदत होते. ही बाब शहरातील नागरिकांनी शिकण्याजोगे आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी