शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

दुर्गम भागातील कार्यक्रम होतात अजूनही प्लास्टिकमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : स्वत:ला उच्चशिक्षीत मानणारे शहरातील नागरिक कार्यक्रमांमध्ये प्रतिबंधीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र ग्रामीण भागात अजुनही कार्यक्रमांसाठी झाडाच्या पानांपासून पत्रावळी, द्रोण तयार केले जातात. त्यामुळे येथील कार्यक्रम प्लास्टिकमुक्त होतात. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक सांगून फिरत नसले तरी ते अप्रत्यक्षपणे पर्यावरणप्रेमी असल्याचे दिसून येते.प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. जाळल्यास अत्यंत विषारी वायू तयार होतात. हे सर्व प्लास्टिक वापराचे तोटे आहेत. शहरी भागातील नागरिक, कर्मचारी, व्यापारी वर्गाला प्लास्टिकच्या वापराचे कोणते दुष्परिणाम आहेत, हे माहित आहेत. याबाबत अनेकदा भाषणेही झोडली जातात. मात्र शहरातील अपवाद वगळता प्रत्येक कार्यक्रमात प्रतिबंधीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केला जातो. बोलायचे वेगळे व करायची कृती वेगळी, अशी स्थिती शहरातील नागरिकांची असल्याचे दिसून येते. दुर्गम भागातील नागरिक मात्र बोलत नसले तरी ते करून दाखवितात. दुर्गम भागातही अनेक समारंभ होतात. या समारंभादरम्यान शेकडो नागरिकांचे सामुहिक जेवन राहते. या सामुहिक जेवनासाठी पळस, मोह व इतर झाडांच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण तयार करतात. या सर्व वस्तू निसर्गातून मिळतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त खर्च होत नाही. तसेच या सर्व वस्तू पर्यावरणपुरक आहेत. विशेष म्हणजे, जंगलातून पाने आणण्यापासून ते द्रोण व पत्रावळी तयार करण्यासाठी गावातील महिला, पुरूष मदत करतात. या मदतीच्या माध्यमातून गावातील एकोपा टिकण्यास मदत होते. ही बाब शहरातील नागरिकांनी शिकण्याजोगे आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी