शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

दुर्गम भागातील कार्यक्रम होतात अजूनही प्लास्टिकमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : स्वत:ला उच्चशिक्षीत मानणारे शहरातील नागरिक कार्यक्रमांमध्ये प्रतिबंधीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र ग्रामीण भागात अजुनही कार्यक्रमांसाठी झाडाच्या पानांपासून पत्रावळी, द्रोण तयार केले जातात. त्यामुळे येथील कार्यक्रम प्लास्टिकमुक्त होतात. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक सांगून फिरत नसले तरी ते अप्रत्यक्षपणे पर्यावरणप्रेमी असल्याचे दिसून येते.प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यानंतर शासनाने काही प्लास्टिकच्या वस्तू वापरावर बंधणे घातली आहेत. यामध्ये विशेष करून प्लास्टिकपासून बनलेल्या पात्र, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, वाटी, थर्माकोलपासून बनलेल्या इतर वस्तू आदींचा समावेश आहे. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. जाळल्यास अत्यंत विषारी वायू तयार होतात. हे सर्व प्लास्टिक वापराचे तोटे आहेत. शहरी भागातील नागरिक, कर्मचारी, व्यापारी वर्गाला प्लास्टिकच्या वापराचे कोणते दुष्परिणाम आहेत, हे माहित आहेत. याबाबत अनेकदा भाषणेही झोडली जातात. मात्र शहरातील अपवाद वगळता प्रत्येक कार्यक्रमात प्रतिबंधीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केला जातो. बोलायचे वेगळे व करायची कृती वेगळी, अशी स्थिती शहरातील नागरिकांची असल्याचे दिसून येते. दुर्गम भागातील नागरिक मात्र बोलत नसले तरी ते करून दाखवितात. दुर्गम भागातही अनेक समारंभ होतात. या समारंभादरम्यान शेकडो नागरिकांचे सामुहिक जेवन राहते. या सामुहिक जेवनासाठी पळस, मोह व इतर झाडांच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण तयार करतात. या सर्व वस्तू निसर्गातून मिळतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त खर्च होत नाही. तसेच या सर्व वस्तू पर्यावरणपुरक आहेत. विशेष म्हणजे, जंगलातून पाने आणण्यापासून ते द्रोण व पत्रावळी तयार करण्यासाठी गावातील महिला, पुरूष मदत करतात. या मदतीच्या माध्यमातून गावातील एकोपा टिकण्यास मदत होते. ही बाब शहरातील नागरिकांनी शिकण्याजोगे आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी