शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

चार हजार शेततळ्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:24 IST

गेल्या तीन वर्षात जिल्हाभरात सुमारे ४ हजार १५९ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देआकस्मिक स्थितीत लाभ : मागेल त्याला शेततळे योजनेला भरभरून प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या तीन वर्षात जिल्हाभरात सुमारे ४ हजार १५९ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आकस्मिक स्थितीत पावसाने धोका दिल्यास शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी या शेततळ्यांचा उपयोग होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. या शेतीला सिंचनाची आवश्यकता आहे. मात्र जिल्ह्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नसल्याने सिंचनाची सुविधा गंभीर झाली आहे. मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नसल्याने शासनाने आता विहीर, शेततळे खोदून देण्यास प्राधान्य दिले आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल या उद्देशाने शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी मागेल त्याला शेततळे बांधून देण्याची योजना सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ५०० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. २०१६ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत जिल्हाभरात ४ हजार १५९ शेततळे बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दुर्गम भागातील शेतकºयांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने धानपीक करपायला लागले होते. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही शेतकऱ्यांनी शेततळ्यांमध्ये मासेमारीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. काही शेततळे मात्र लवकरच आटत असल्याने बेकामी होतात.उद्दिष्टापेक्षा सहा पट जास्त निर्मितीगडचिरोली जिल्ह्याला १ हजार ५०० शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ४ हजार १५९ शेततळ्यांचे कामे पूर्ण झाली आहेत. ८ हजार १५३ शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ८ हजार १०७ शेततळे बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. सुमारे ६ हजार ७२ शेततळे बांधण्याचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. ५ हजार ७३९ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. उद्दिष्टाच्या जवळपास सहा पट शेततळे बांधली जाणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये शेततळे योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उद्दिष्टापेक्षा अत्यंत कमी अर्ज प्राप्त झाले. मात्र गडचिरोली जिल्ह्यात या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. सिंचन वाढेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना