शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करण्यास बँकांसमोर अडचणी

By admin | Updated: January 17, 2015 22:58 IST

खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी त्याचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज सवलत देण्याची सरकारची योजना आहे. या योजनेमुळे राष्ट्रीयकृत बँकासह

गडचिरोली : खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी त्याचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज सवलत देण्याची सरकारची योजना आहे. या योजनेमुळे राष्ट्रीयकृत बँकासह सहकारी बँकांची कर्जवसुली सध्या थंडबस्त्यात आहे. शेतकरीही १५ मार्चनंतर या कर्जाचा भरणा करून व्याजमाफी सवलतीचा लाभ घेण्याच्या तयारीत राहतो, असे बँकींग क्षेत्रातील जाणकारांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गडचिरोली जिल्ह्यात सरकार दप्तरी १ हजार १४६ शेतकऱ्याची नोंद आहे. जिल्ह्यात २ लाख हेक्टर शेती ही शेतकरी कसत आहे. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी कर्ज व्याज सवलत योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफीचा लाभ दिला जातो. शून्य टक्के व्याजदरावर हे कर्ज उपलब्ध केले जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सरकारकडून सवलत योजनेची रक्कम खात्यावर जमा होण्याची वाट न पाहता शेतकऱ्याची मुद्दल रक्कम जमा करून घेते. मात्र राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जावर सात टक्के व्याज आकारून शेतकऱ्यांकडून कर्जाचा भरणा करून घेते. त्यानंतर सरकारकडून बँकेला प्राप्त होणारी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते, अशी पध्दतीने आता पीक कर्ज वसुलीचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेषत: बँकाही शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीसाठी सक्ती करू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी पथक तयार करायच्या परंतु विदर्भात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्याने बँकांनी वसुलीच्या प्रणालीतही कमालीचे बदल केले आहे. थकीत वसुली वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावून त्यांना व्याज दराचे स्लॅब समजावून दिले जात आहे. आपण जुने कर्ज भरले तर नवे कर्ज तुम्हाला उपलब्ध होईल, असे सांगून मिळेल तेवढे पैसे घेतले जाते.