शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मागणी घटल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्यात आले. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना भेंडी, कारले व अन्य भाजीपाला विक्री करता आला नाही.

ठळक मुद्देआरमोरी तालुक्याच्या शंकरनगर, जोगीसाखरा परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजीपाला स्थानिकस्तरावरच कमी किमतीत विकावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान होत आहे. जोगीसाखरासह शंकरनगर, रामपूर आदी गावांमध्ये भेंडीचे बऱ्याप्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु मागणी घटल्याने कमी किमतीत भेंडीची विक्री करावी लागत आहे.लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्यात आले. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना भेंडी, कारले व अन्य भाजीपाला विक्री करता आला नाही. गाव सिल केल्याने बाहेरच्यांना गावात प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी गावातील भाजीपाला उत्पादकांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटला. भाजीपाला विक्री करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील झाडालाच भेंडी, वांगी, कारले पिकल्यागत झाले. ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने भाजीपाला बाहेर विक्री करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. शंकरनगर व जोगीसाखरा गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकरी चिंताग्रस्त असतानाच खरीप हंगामाचे आर्थिक नियोजन करताना शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात तालुका प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची विक्री करण्याकरिता योग्य व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. याचा जोरदार फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला. मिळेल त्या प्रमाणात शेतकºयांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केला. परंतु यात त्यांना तोटाच सहन करवा लागला.महिनाभरच विक्रीअनेक शेतकऱ्यांनी धान पऱ्हे टाकण्यास सुरूवात केली आहे. पऱ्ह्यांची वाढ झाल्यानंतर २१ ते २२ दिवसांनी रोवणीला सुरूवात होईल. अशा स्थितीत शेतात असलेली भाजीपाला व फळभाज्यांच्या बागा नष्ट करून त्याजागी धानाची लागवड शेतकरी करणार आहेत. त्यामुळे ज्याच्यांकडे सध्या भेंडी, वांगी, कारले व अन्य भाजीपाल्याच्या बागा आहेत, अशा शेतकऱ्यांना जवळपास महिना ते दीड महिना भाजीपाला विक्री करण्यास मिळणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्या