शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मागणी घटल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्यात आले. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना भेंडी, कारले व अन्य भाजीपाला विक्री करता आला नाही.

ठळक मुद्देआरमोरी तालुक्याच्या शंकरनगर, जोगीसाखरा परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजीपाला स्थानिकस्तरावरच कमी किमतीत विकावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान होत आहे. जोगीसाखरासह शंकरनगर, रामपूर आदी गावांमध्ये भेंडीचे बऱ्याप्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु मागणी घटल्याने कमी किमतीत भेंडीची विक्री करावी लागत आहे.लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्यात आले. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना भेंडी, कारले व अन्य भाजीपाला विक्री करता आला नाही. गाव सिल केल्याने बाहेरच्यांना गावात प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी गावातील भाजीपाला उत्पादकांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटला. भाजीपाला विक्री करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील झाडालाच भेंडी, वांगी, कारले पिकल्यागत झाले. ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने भाजीपाला बाहेर विक्री करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. शंकरनगर व जोगीसाखरा गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकरी चिंताग्रस्त असतानाच खरीप हंगामाचे आर्थिक नियोजन करताना शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात तालुका प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची विक्री करण्याकरिता योग्य व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. याचा जोरदार फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला. मिळेल त्या प्रमाणात शेतकºयांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केला. परंतु यात त्यांना तोटाच सहन करवा लागला.महिनाभरच विक्रीअनेक शेतकऱ्यांनी धान पऱ्हे टाकण्यास सुरूवात केली आहे. पऱ्ह्यांची वाढ झाल्यानंतर २१ ते २२ दिवसांनी रोवणीला सुरूवात होईल. अशा स्थितीत शेतात असलेली भाजीपाला व फळभाज्यांच्या बागा नष्ट करून त्याजागी धानाची लागवड शेतकरी करणार आहेत. त्यामुळे ज्याच्यांकडे सध्या भेंडी, वांगी, कारले व अन्य भाजीपाल्याच्या बागा आहेत, अशा शेतकऱ्यांना जवळपास महिना ते दीड महिना भाजीपाला विक्री करण्यास मिळणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्या